Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा दुसरा भाग असलेला वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचे काम वेगाने सुरू आहे. हा सेतू एकदा तयार झाला की 100 वर्षे तसाच राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. कसा असेल हा मार्ग आणि कधी पूर्ण होणार ते पाहूया…
कसा आहे संपूर्ण मार्ग?
या संपूर्ण मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पातील सी लिंकचे काम सध्या जोमाने सुरू असून, मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचा भाग असलेल्या वर्सोवा–वांद्रे सी लिंकचे काम शहराच्या किनारपट्टीपासून सर्वात दूरच्या बिंदूपर्यंत पोहोचले आहे. वांद्रे आणि जुहू दरम्यान अरबी समुद्रात तब्बल 900 मीटर आतपर्यंत हे काम पूर्ण झाले आहे. याचबरोबर चार दरीपूलांचे (इंटरचेंज/कनेक्टर ब्रिज) कामही सुरू आहे. वांद्रे, कार्टर रोड, जुहू कोलिवाडा आणि वर्सोवा येथे हे दरीपूल बांधण्यात येणार असून, संबंधित ठिकाणी खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
Bhusawal-Chittorgarh Highway: जळगावमध्ये बनतोय आणखी एक राष्ट्रीय महामार्ग; राजस्थान, मध्य प्रदेशमधून थेट… कसा असेल नवा मार्ग?
25 किलोमीटर लांबीचा VBSL हा किनारी मार्गाच्या नरिमन पॉइंट-वरळी टप्प्याचा, दक्षिणेकडील वांद्रे–वरळी सी लिंकचा आणि उत्तरेकडील वर्सोवा–कांदिवली–भाईंदर किनारी मार्गाचा एक अत्यंत महत्त्वाचा छेदनबिंदू ठरणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे सध्या 26 टक्के काम पूर्ण झाले असून, मार्च 2028 पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
100 वर्षे काहीच होणार नाही
हा सागरी सेतू MSRDC कडून उभारण्यात येत असून, त्याची अपेक्षित आयुमर्यादा 100 वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या प्रकल्पासाठी सुमारे 1500 झाडांची कत्तल होणार असल्याने पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Double-Decker Flyover: पुण्यातील पहिला डबल डेकर उड्डाणपूल 2 महिन्यात होतोय सुरू; बाणेर, शिवाजीनगर… कुठून-कुठे जोडणार हा मार्ग?
हा संपूर्ण किनारी मार्ग एकूण 60 किलोमीटर लांबीचा असून, मुंबईतील अनेक महत्त्वाच्या मार्गांना जोडणार आहे. सध्या वर्सोवा ते भाईंदर प्रवासासाठी 90 ते 120 मिनिटे लागतात. मात्र, हा सागरी सेतू पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांत पार करता येणार असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
