Latur Minor Student Commits Suicide : लातूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. लातूर जिल्हा देखील हादरला आहे.
नेमकं काय घडलं?
लातूरमधील एका विद्यालयातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील सहावी इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा वसतिगृहातील खोलीत मृत्यू झाल्याचं आढळून आलं आहे. सदर विद्यार्थिनीचा मृतदेह मुलींच्या वसतिगृहातील खोलीत पलंगाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Raigad Crime : चित्रपटाच्या पटकथेलाही लाजवेल असा दरोड्याचा थरार, घरातल्यांचा छळ अन् 18 लाख लुटले
नातेवाईकांचा गंभीर आरोप
मृत विद्यार्थिनी अत्यंत हुशार, अभ्यासू असल्याचं शिक्षक व सहाध्यायी सांगतात. तिचे वडील औसा तालुक्यातील टाका गावचे रहिवासी असून ते मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्राथमिक माहितीनुसार, या विद्यालयातील अभ्यासाचा ताण, स्पर्धात्मक वातावरण आणि अतिरिक्त दबावामुळे विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली होती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नातेवाईकांनी हा प्रकार आत्महत्या नसून घातपाताचा असल्याचा गंभीर आरोप केल्याने प्रकरण अधिक संशयास्पद बनलं आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्या की घातपात, याचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून वसतिगृहातील कर्मचारी, शिक्षक तसेच विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे.
Nashik Crime : ‘ये ओम्या, नको रे…’; गप्पा मारताना अचानक हल्ला, मध्यरात्री धारदार शस्त्राने हल्ला, तरुणाला गल्लीतल्या पोरांनी संपवलं; CCTV
उपस्थितांचे डोळे पाणावले
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत विद्यार्थिनीच्या आई-वडील, आजी-आजोबा यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेनंतर विद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पालकांनी गर्दी केली. काही पालकांनी विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे आरोप करत प्रशासनाकडे तक्रारी केल्या असून, त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात राहत असल्याचा दावा करण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विद्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पोलीस तपासातून लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
