• Mon. Mar 9th, 2026

    Municipal Elections: निवडणुकांचे रिंगण सजले, 29 महापालिकांसाठी 33 हजारांहून अधिक उमेदवार मैदानात; कोण मारणार बाजी?

    Municipal Elections: निवडणुकांचे रिंगण सजले, 29 महापालिकांसाठी 33 हजारांहून अधिक उमेदवार मैदानात; कोण मारणार बाजी?

    Maharashtra Elections: राज्यातील २९ महापालिकांमधील २,८६९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एकूण ३३,६०६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. युती, आघाडी, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे.

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: युती, महायुती, आघाडी, बिघाडी, स्वबळ या सर्व गदारोळाच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून तिकीट मिळालेले, न मिळालेले, नाराज, बंडखोर, अपक्ष, दुसऱ्या पक्षातून येऊन ऐन वेळी उमेदवारी मिळालेले इत्यादी अशा एकूण ३३ हजार ६०६ उमेदवारांनी २९ महापालिकांतील दोन हजार ८६९ जागांसाठी अर्ज दाखल केले आहेत. पुणे महापालिकेसाठी दोन हजार ३९७ उमेदवार नशीब आजमावण्यास उत्सुक असून, मुंबई महापालिकेसाठी २,५१६ उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत.

    महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर मंगळवार, ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. २९ महापालिकांमधील ८९३ प्रभागांतील २ हजार ८६९ जागांसाठी एकूण ३३ हजार ६०६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून बुधवारी देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ३ हजार १७९ तर पनवेल महापालिकेच्या २० प्रभागांतील ७८ जागांसाठी ३९१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील इतर महानगरपालिकांच्या तुलनेत ही आकडेवारी सर्वात कमी आहे.

    Maharashtra TimesSolapur News : याला म्हणतात ‘गेम’! मशालीचा एबी फॉर्म घेतला अन् भाजपमधून अर्ज दाखल केला

    पुण्यात २,३९७ उमेदवार

    महाविकास आघाडी, शिवसेना (शिंदे) तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकाच प्रभागात एकाहून अधिक दिलेल्या ‘एबी’ फॉर्ममुळे छाननी दरम्यान मोठा गोंधळ उडाला. याशिवाय अपूर्ण कागदपत्रे आणि अर्जातील गोंधळ लक्षात घेता १३१ अर्ज बाद झाले आहेत.

    पुण्यात नऊ वर्षानंतर महापालिकेची निवडणूक होत असून छाननीनंतर दोन हजार ३९७ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. यातील प्रमुख पक्षांकडून आपआपल्या उमेदवारांना फायदा होईल, अशा अपक्षांचे अर्ज मागे घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. अर्ज माघारीसाठी दोन दिवसांचा कालावधी असल्याने या काळात प्रत्येक प्रभागातील राजकारण पाहता आडाखे बांधण्यात येत आहेत. त्यासाठी काही अर्ज मागे घेतले जातील, तर काही अर्ज जाणीवपूर्वक ठेवून निवडणूक लढवली जाईल.

    Maharashtra Timesझटपट पटापट! काल राष्ट्रवादीतून भाजपात, 24 तासांत नगरसेवकपद; निष्ठावंत राहिले बघत, अनोखा विक्रम

    सहा उमेदवार बिनविरोध

    भाजपचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात कल्याण-डोंबिवलीतील तीन, पनवेलमधील एक, तर धुळ्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवलीत रेखा चौधरी, आसावरी नवरे आणि रंजना पेणकर या तिघी, पनवेलमध्ये नितीन पाटील, तर धुळ्यात उज्ज्वला भोसले आणि ज्योत्स्ना पाटील या दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आल्या.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा