• Fri. Mar 6th, 2026
    उमेदवारी मिळाल्याचा आनंद, समर्थकांसह अर्जही भरला अन् काही मिनिटांत श्वास कायमचा थांबला

    Mira Bhayandar Municipal Corporation Election 2026: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत उमेदवाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    – भाविक पाटील

    मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करून बाहेर पडल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जावेद पठाण (६६) असे मृत उमेदवाराचे नाव आहे. या घटनेवर शहरवासीयांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    मिरा रोड च्या नया नगर भागातील निवडणूक कार्यालयात पठाण मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रभाग क्रमांक २२ मधून अर्ज दाखल करण्यास त्यांच्या समर्थकांसह दाखल गेले होते. येथे काही वेळाने अर्ज दाखल करून पठाण बाहेर पडले. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तात्काळ त्यांच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून घोषित करण्यात आले. तर, भाजपच्या पदाधिकारी वनिता बने यांना तिकीट नाकारल्यानंतर प्रकृती बिघडून हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
    Maharashtra TimesBMC Election 2026: धनुष्यबाणावर लढायची ऑफर, शिंदेंची भेट, भाजपमधून ग्रीन सिग्नल; तरीही उमेदवाराची माघार; कारण काय?
    मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. शहरात १५ जानेवारीला मतदान होणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येईल.

    मिरा-भाईंदर महापालिकेत कोणाची किती ताकद?
    मिरा-भाईंदर महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ मध्ये झाली. या निवडणुकीत भाजपनं ९५ पैकी ६१ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. तर त्यावेळी एकसंघ असलेल्या शिवसेनेला २२ जागा मिळाल्या. भाजपच्या जागा तब्बल ३२ नं वाढल्या. तर शिवसेनेच्या जागा ८ नं वाढल्या. काँग्रेसच्या जागा नऊनं घटल्या आणि १० वर आल्या. तर अपक्षांना २ जागा मिळाल्या.
    Maharashtra TimesBMC Election 2026: शिंदेंचे 2 ‘धुरंधर’ भाजपला नडले, जागावाटपात अडून बसले; 52 जागांची ऑफर असताना 90 जागा मिळवल्या
    २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला २९ जागा मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठी मुसंडी मारत २७ जागा खिशात घातल्या होत्या. तर काँग्रेसला १९ जागांवर यश मिळालं होतं. शिवसेनेला १४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर मनसेनं १ जागा जिंकत खातं उघडलं होतं. अन्य लहान पक्षांना ३, तर अपक्षाला १ जागा मिळाली होती.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा