• Sat. Mar 7th, 2026

    Guhagar News: गुहागरच्या वीकेंड ट्रिपवर अप्रित घडलं; समुद्रात पोहायला उतरताच तिघे बुडाले अन्… मुंबईतील इंजिनियरचा अंत

    Guhagar News: गुहागरच्या वीकेंड ट्रिपवर अप्रित घडलं; समुद्रात पोहायला उतरताच तिघे बुडाले अन्… मुंबईतील इंजिनियरचा अंत

    Man Drowns in Sea: गुहागरमध्ये पुन्हा एकदा समुद्रात पोहायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. वीकेंडसाठी ट्रिपवर गेलेले तिघंजण समुद्रात बुडू लागल्याने त्यांना वाचवायला स्थानिक गेले. परंतु त्यावेळी एकचा मृत्यू झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: समुद्रकिनारी पोहताना काळजी न घेतल्यास थेट जीवावरती बेतू शकते अशा काही घटना कोकणात यापूर्वी समुद्रकिनारी घडल्या आहेत. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या निमित्ता सध्या कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर समुद्रकिनारी घडली आहे. गुहागर समुद्रकिनारी पोहायला गेलेल्या अमुल विजयकुमार मुत्था (जैन) (वय 42, रा. पवई, मुंबई, व्यवसाय -सॉप्टवेअर इंजिनियर) यांचा समुद्रात बुडाल्याने दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे.

    नेमकं काय घडलं?

    गुहागर समुद्र किनाऱ्यावर तीन पर्यटक पोहोण्यासाठी उतरले होते. मात्र यावेळी हे तीन पर्यटक समुद्रातील आलेल्या मोठ्या लाटेबरोबर ओढले गेले. हे तिघंजण बुडू लागले. त्यांनी आरडाओरडा केल्याने स्थानिकांच्या लक्षात आलं की काही जण बुडत आहेत. स्थानिकांनी तात्काळ प्रसंगावधान राखत या तीनही पर्यटकांना बाहेर काढायला सुरूवात केली. या तीन पर्यटकांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश होता. समुद्रकिनाऱ्यावरील जेटस्कीच्या मदतीने बुडणाऱ्या व्यक्तींना किनाऱ्यावर आणण्यात आले. Maharashtra TimesRatnagiri News: ख्रिसमससाठी कोकणात आले, पण शेवटच्या दिवशी एकुलत्या एका लेकीचा दुर्दैवी अंत; 13 वर्षीय आंचलसोबत काय घडलं?

    तिघांना वाचवायला गेले पण…

    त्यांना तात्काळ गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यातील एकाला मृत घोषित केले. पर्यटकांना वाचवण्यासाठी गुहागर येथील समर्थ वॉटरस्पोर्ट्स कर्मचारी मुजाहिंद मिरकर,शद्दाम बागकर गुहागर नगरपंचायत कर्मचारी,प्रदेश तांडेल जिवरक्षक आशिष सांगळे जिवरक्षक यांनी मोठी कामगिरी बजावली.

    कोकणाला डॅमेज करण्याचा प्रयत्न, इटलीची केमिकल कंपनी रत्नागिरीत, उदय सामंत काय म्हणाले?

    गुहागरातील पोलिस प्रशासन, जीव रक्षक, पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थ येथे येणाऱ्या पर्यटकांना समुद्रात पोहायला जाऊ नये अशी सूचना कायम देत असतात. त्याचे पालन पर्यटकांनी करावे म्हणजे मौजमजा करण्यासाठी आलेल्या कोणालाही अशा दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागणार नाही असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे कोकणात आलेल्या पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्याचा आनंद घ्यावा मात्र यावेळी स्थानिकांकडून व प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे अतिसाहस करण्यासाठी उत्साहाच्याभरात समुद्रात जाऊ नये असं मत या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटकांच्या कोकण ट्रिपचा असा भयानक अंत होईल असा कोणीच विचारही केला नव्हता.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा