• Tue. Mar 10th, 2026
    Local Train Update : आसनगाव – कसारा मार्गावर गर्दी कमी होणार, पुढच्या वर्षी मध्य रेल्वेची मोठी सुविधा; प्रवाशांना मोठा दिलासा

    Kasara-Asangaon Third Line : आसनगाव – कसारा – टिटवाळा या मार्गावरुन लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या मार्गावर लवकरच तिसरी लाईन सुरू होणार असून याचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईतून कल्याण, कसारा मार्गाकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आसनगाव आणि कसारा दरम्यानच्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या मार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 2026 मध्ये तिसऱ्या मार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

    कसारा, आसनगाव मार्गावर प्रवाशांना दिलासा

    टिटवाळा, कसारा आणि आसनगाव स्थानकांतील प्रवाशांना सर्वाधिक फायदा होईल. या मार्गावर तुडुंब गर्दी असते. अशात ही तिसरी लाईन आसनगाव, कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरले. या तिसऱ्या लाइनचं काम अंतिम टप्प्यात आहे. कसारा आणि आसनगाव दरम्यानचा पहिला टप्पा 2026 मध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती, मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.
    Maharashtra TimesLocal Train Update : नवी मुंबईत प्रवाशांना मोठा दिलासा, रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ; अतिरिक्त फेऱ्या कोणत्या मार्गावर सुरू?

    कसारा-आसनगाव मार्गावर लोकलसाठी तिसरी लाईन

    आसनगाव – कसारा सेक्शन मागील 164 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट अर्थात MUTP अंतर्गत येणाऱ्या या नवीन प्रकल्पाचं उद्देश या अतिशय गर्दीच्या उपनगरीय मार्गावरील गर्दी कमी करणं आणि रेल्वे वाहतूक सुधारणं हा आहे. कल्याण आणि कसारा दरम्यान 67 किमी अंतर आहे. त्यात कल्याण – कसारा मार्गातील आसनगाव – ते पुढे कसारा मार्ग 35 किमी लांबीचा आहे. याच मार्गावरुन केवळ दोन ट्रॅकवर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या अशा दोन्ही गाड्या धावतात. त्यामुळेच तिसरी लाईन झाल्यास याचा येथील प्रवाशांना फायदा होईल. आसनगाव – कसारा ही तिसरी लाईन उपनगरीय लोकलसाठी असेल.

    मराठी बोला, तुम्ही मराठी बोला….मुंबई लोकल ट्रेनमधील गाणं होतंय व्हायरल

    कसारा – आसनगाव या तिसऱ्या प्रकल्पाला 2011 च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 2016 मध्ये या लाइनचं काम सुरू झालं. आता बांधकाम अंतिम टप्प्यात आलं असून 2026 पर्यंत ते पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ही तिसरी लाईन एकदा पूर्ण झाल्यानंतर कसारा येथे अतिरिक्त गाड्या चालवता येतील, या अतिरिक्त लोकलमुळे गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा