• Tue. Jun 9th, 2026
    Washim News: आईचा आधारवड कोसळला! पती मनोरुग्ण तर दोन कोवळी पोरंही गेली; मामा-भाच्यांच्या भयानक मृत्यूने वाशिम हळहळले

    पंकज गाडेकर, वाशिम : मासोळ्या आणि खेकडे पकडायला गेलेल्या मामासह दोन सख्या भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सनगाव येथील मामा आणि दोन भाचे रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यांचे कपडे धरणाच्या काठावर आढळून आल्याने त्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याचा संशय आला. गावकऱ्यांनी त्यांचा पाण्यात शोध घेण्यात सुरुवात केली, बराच काळ शोध घेतला असता प्रयत्न निष्कळ गेल्याने आणि रात्री उशीर झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली.

    सकाळी पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाच्या चमूला घटनास्थळी बोलावून शोध मोहीम राबवली असता अथक प्रयत्नानंतर तिघांचा मृतदेह धरणात मिळून आला. सिद्धार्थ मोहन बनसोड वय (35वर्ष), (मामा) आणी अंकुश राजेंद्र भालेराव वय (16 वर्ष), कार्तिक राजेंद्र भालेराव वय (14वर्ष) असे मृतदेह मिळून आलेल्या मृतांचे नाव आहेत.

    नेमंक काय घडलं?

    प्राप्त माहितीनुसार राजेंद आणि कार्तिकचे वडील मनोरुग्ण असल्याने ते आपल्या आईसह मंगरूळपीर तालुक्यातील सनगाव येथे मामाच्या गावी राहत होते. काल 25 डिसेंबर रोजी मामा आणि दोन्ही भाचे मासोळ्या आणि खेकडे पकडण्यासाठी गावाजवळील धरणात गेले होते. ते धरणावर गेले असल्याची माहिती नव्हती आणि रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाही त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरवात केली. मात्र कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे आसेगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली. Pune News: दोन ‘राष्ट्रवादी’ पुन्हा एक? अजित पवार आणि शरद पवार गटाच्या नेत्यांची बैठक; आज मोठ्या निर्णयाची शक्यता

    आसेगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ शोध मोहीम सुरू केली असता धरणाच्या काठावर तिघांचे कपडे आढळून आल्याने तिघेही मासोळ्या, खेकडे पकडण्यासाठी धरणात उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. तेव्हा पोलिसांनी गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने धरणाच्या पाण्यात शोध मोहीम राबविली, मात्र रात्री उशीर झाल्याने अंधारामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

    आसेगाव पोलिसांनी आज सकाळी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा बचाव व शोध मोहीम पथकाला बोलावून पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, मयुर सळेदार, शेखर केवट, अतुल उमाळे, अश्विन केवट, विष्णु केवट, हर्षल वानखडे, विद्याधर वाघमारे, योगेश आगळे, यांचेसह रेस्कु बोट आणी शोध व बचाव साहीत्यासह आज दुपारी घटनास्थळी पोहचले आणी लोकेशन ट्रेस करुन सर्च ऑपरेशन चालु केले असता 15 फुट खोल पाण्यात शोध मोहीम राबविली असता अथक प्रयत्नानंतर तिघांचेही मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात यश आले.

    वडील मनोरुग्ण असल्याने मामाच्या गावी राहणाऱ्या मामासह दोन भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून घटनास्थळावर आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे , सहायक पोलीस उप निरीक्षक गणेश भोयर, हे.काॅ. विजय शिंगारे, पो.काॅ. सुनिल गंडईत, तलाठी ठोंबे, पो.पा.विक्रम पवार, तंटामुक्ती अध्यक्ष समाधान भगत यांचेसह गावातील नागरीक व नातेवाईक हजर होते.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed