• Sat. Mar 7th, 2026
    Chhatrapati Sambhajinagar Crime : ‘नात्यातलं चांगलं स्थळ’ आलं म्हणून बापाने लावलं १६ वर्षांच्या लेकीचं लग्न;  पण अक्षता पडण्यापूर्वीच… छ. संभाजीनगरमध्ये काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar News : 18 वर्षाखालील कोणाचाही विवाह करणं कायद्याने गुन्हा आहे. छ. संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नात्यातला मुलगा असल्याने घरच्यांनी अल्पवयीन मुलीला लग्नासाठी तयार केलं, पण.. पुढे काय घडलं? जाणून घ्या

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : “नात्यातलं चांगलं स्थळ आहे, आता सोडून कसं चालेल?” या एका विचारापोटी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आला. मात्र, अक्षता पडण्यापूर्वीच ग्रामीण पोलिसांच्या दामिनी पथकाने ‘एन्ट्री’ घेतली आणि एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद जवळील देवळाना शिवारात घडली.

    नेमकी घटना काय?

    दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, खुलताबाद जवळील देवळाना शिवारात एका अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे, मुलीचे वय अद्याप लग्नाचे झाले नसतानाही, केवळ नात्यातील मुलाकडून मागणी आल्याने पालकांनी लग्नाची घाई केली होती. अंगणात मांडव पडला होता, नातेवाईकांची लगबग सुरू होती आणि ही अल्पवयीन मुलगी ‘नवरी’ म्हणून सजून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत होती.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News : राहत्या घरातच कत्तलखाना, किचन आणि टेरेसवर ४ फूट खोल हौद, जनावरांचे अवशेष साडल्याने महाराष्ट्रात खळबळ

    पोलिसांचा ‘दूत’ बनून प्रवेश….

    घटनेचे गांभीर्य ओळखून दामिनी पथकाच्या प्रमुख एपीआय सरला गाडेकर आणि त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळ गाठले.पोलिसांनी मुलीच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली असता, तिचे वय केवळ १६ वर्षे ९ महिने असल्याचे समोर आले.
    Maharashtra TimesMNS : राज्यात ठाकरे बंधू एकत्र, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठं भगदाड

    खडक समुपदेशन आणि कारवाईचा इशारा

    मुलीच्या हातांत जिथे पुस्तके असायला हवीत, तिथे संसाराची धुरा सोपवणाऱ्या पालकांना पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला. बालविवाह करणे हा गंभीर गुन्हा असून, यासाठी २ वर्षे सक्तमजुरी आणि २ लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते, असे पोलिसांनी बजावले. “ज्या वयात स्वप्न पाहायची, त्या वयात मातृत्व नको,” या शब्दांत केलेल्या समुपदेशनानंतर पालकांनी आपली चूक मान्य केली.पोलिसांच्या मध्यस्थीनंतर, मुलगी सज्ञान होईपर्यंत तिचे लग्न लावणार नाही, असे लेखी आश्वासन पालकांनी दिले. या यशस्वी कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीला तिचे शिक्षण सुरू ठेवण्याची नवी संधी मिळाली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा