खासदार सुप्रिया सुळे यांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी अजब वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या पुण्याच्या राजकारणात वेगवेगळी चर्चा सुरु आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : राज्यभरात येत्या 15 तारखेला 29 महानगरपालिकेसाठी मतदान पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा विरोध होता. अखेर त्यांनी आपल्या शहराध्यक्ष पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्यापूर्वी आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी दिवसभर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला. मात्र यावेळी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका वक्तव्याची वेगळीचं चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुप्रिया सुळे यांना पुणे शहर आणि प्रशांत जगताप यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जात असताना सुप्रिया सुळे यांनी अजब वक्तव्य केल आहे. “तुम लोगो को डबके मे रहने का बहुत शोक है, मे समंदर की मछली हुँ… आता पुण्याची खूप चर्चा झाली शहराची खूप चर्चा झाली. या जगामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे”. त्यामुळे सुप्रिया सुळे या शहराबद्दल प्रश्न विचारल्यावर उलट पत्रकारांनाच तुम्हाला डबक्यात राहायची सवय आहे असं म्हटल्यामुळे सुप्रिया सुळे नेमकं डबक कशाला म्हणाल्या? यावरून पुण्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या म्हणण्यानुसार प्रशांत जगताप यांचा प्रश्न हा डबक आहे की पुण्याचे प्रश्न खूप झाले जगात बोलण्यासारखं खूप आहे असं म्हणणं म्हणजे पुणे शहर डबक आहे? असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्यामुळे एकीकडे प्रशांत जगताप यांचा राजीनामा आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य यावरून आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळे याच पुणे आणि मुंबईचं तसेच राज्याचे नेतृत्व करतील असं त्यांनी यावेळेस ठासून सांगितलं. तर दुसरीकडे आणखी युती संदर्भात शरद पवारांना कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्यामुळे दोन राष्ट्रवादीच्या युती संदर्भात कधीपर्यंत निर्णय होणार? याकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकीकडे सुप्रिया सुळे यांनी आपण पुणे, मुंबई तसेच राज्याचे नेतृत्व करणार असल्याचं सांगितलं असून दुसरीकडे प्रशांत जगताप यांनी सुद्धा राजीनाम्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण राजीनामा दिला असला तरी राजकारण सोडणार नाही, आपण पुणे महापालिकेची निवडणूक लढवणार, असं प्रशांत जगताप यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता प्रशांत जगताप अपक्ष निवडणूक लढवणार की कोणत्या पक्षात प्रवेश करणार? याबाबत औत्सुकता निर्माण झाली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा