• Sat. Mar 7th, 2026
    Nagarparishad Election Result : सावधान! मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कडक निर्बंध; ‘एक चुकीची पोस्ट महागात’

    राज्यभरात पार पडलेल्या नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियाबाबत महत्त्वाची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोशल मीडियाबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांना जाहीर इशारा देण्यात आला आहे. मतमोजणी दरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, चिथावणीखोर, वादग्रस्त किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, कमेंट, व्हिडीओ, ऑडिओ, बॅनर प्रसारित करू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

    प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजकीय, सामाजिक किंवा धार्मिक व्यक्ती, गट अथवा समाजाच्या भावना दुखावणाऱ्या आशयावर ‘शून्य सहनशीलता’ ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारचा मजकूर तयार करणे, पोस्ट करणे किंवा फॉरवर्ड करणे हे कायद्याने दंडनीय ठरणार आहे. संबंधित व्यक्तीविरोधात तात्काळ कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे, केवळ पोस्ट करणारी व्यक्तीच नव्हे तर ती पोस्ट शेअर करणारे ग्रुप सदस्य आणि संबंधित व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडिया ग्रुपचे अ‍ॅडमिन यांनाही जबाबदार धरले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    Maharashtra TimesSanjay Khodke Accident : अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद, धक्कादायक व्हिडीओ समोर
    या पार्श्वभूमीवर, सर्व सोशल मीडिया ग्रुप अ‍ॅडमिनना मतमोजणी आणि निकालाच्या कालावधीत ‘Only Admin’ सेटिंग सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे कोणताही ग्रुप सदस्य वादग्रस्त किंवा भडक पोस्ट टाकणार नाही, याची खबरदारी घेता येईल. प्रशासनाने याबाबत अ‍ॅडमिननी सहकार्य न केल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे ठामपणे सांगितले आहे.

    दरम्यान, रायगड जिल्ह्यात सायबर सेलचे विशेष पथक सक्रिय करण्यात आले असून फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर) आदी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. कोणतीही अफवा, खोटी माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करणारा मजकूर आढळल्यास तात्काळ त्याची दखल घेतली जाणार असून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
    Maharashtra TimesShalini Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन
    लोकशाहीचा हा महत्त्वाचा टप्पा शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पडावा, यासाठी नागरिकांनी संयम बाळगावा, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही संशयास्पद पोस्ट आढळल्यास ती पुढे न पाठवता प्रशासनाच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी शांतता आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा