• Sun. Mar 8th, 2026

    जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली सर्वात मोठी बातमी, माजी मंत्री अनिल पाटील यांचे वेगळे संकेत

    जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातली सर्वात मोठी बातमी, माजी मंत्री अनिल पाटील यांचे वेगळे संकेत

    जळगाव महानगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे. मात्र महायुती व्हावी ही प्रत्येक नेत्यांची इच्छा आहे. पण समाधानकारक जागा भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला द्याव्या, अशी मागणी माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    निलेश पाटील, जळगाव : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढवतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत ठरले आहे. पण खरंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने आज त्यांच्या कार्यालयामध्ये दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी भूमिका मांडली. जळगाव महानगरपालिकेसाठी उपस्थित जागांचा प्रस्ताव आम्ही भाजपाला देणार आहोत, असं अनिल पाटील म्हणाले. अनिल पाटील यांनी आपल्या पक्षासाठी जितक्या जागांची मागणी केली तेवढ्या जागा भाजप देणार नाही हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. पण मागणी करणे हे त्या नेत्यांचे काम आहे. 35 जागांची मागणी केल्याने राष्ट्रवादी अजित पवार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असेच यातून संकेत मिळत आहेत.

    “प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार काल मुंबई येथे बैठक पार पडली. त्यांनी महानगरपालिका संदर्भात महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरी जळगाव महानगरपालिकेसाठी आमच्या पक्षाकडे जवळपास 79 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये आम्हाला उपस्थित जागा मिळाव्या यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत. जर काही जागांवर त्यांचे उमेदवार प्रबळ दावेदार असले तर एक-दोन पाऊल आम्ही मागे घ्यायला देखील तयार आहेत”, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी दिली आहे.
    Maharashtra TimesSanjay Khodke Accident : अमरावतीत आमदार संजय खोडके यांचा भीषण अपघात, घटना सीसीटीव्हीत कैद, धक्कादायक व्हिडीओ समोर
    खरंतर भारतीय जनता पार्टीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महानगरपालिकेमध्ये एकही उमेदवार त्यांचा नगरसेवक म्हणून निवडून आलेला नव्हता. त्यामुळे त्यांना जवळपास तीन ते पाच जागा भाजपकडून देण्यात येतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे आमदार अनिल पाटील 35 जागांची मागणी करत असतील आणि भाजप आणि त्यांना तीन ते पाच जागा देऊ करत असेल तर राष्ट्रवादी नक्कीच स्वबळावर निवडणूक लढवेल, असेच यातून स्पष्ट संकेत मिळत आहेत.
    Maharashtra TimesShalini Patil : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन
    यामुळे जळगाव महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युती करू शकते. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, असेच संकेत आजच्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल पाटील यांच्या बोलण्यातून मिळाले आहे. दरम्यान, “उद्या नगर परिषदेचा निकाल लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे या निवडणुकीत जवळपास 70 नगरसेवक जिल्ह्यात निवडून येतील आणि चार नगरपालिकांवरती नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये वाढणार आहे”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा