• Sun. Jun 14th, 2026

    Nagpur News: नागपूर-नवी मुंबई थेट विमानसेवा, 25 डिसेंबरपासून उड्डाणांना सुरूवात; कसा होईल फायदा?

    Nagpur News: नागपूर-नवी मुंबई थेट विमानसेवा, 25 डिसेंबरपासून उड्डाणांना सुरूवात; कसा होईल फायदा?

    Nagpur-Navi Mumbai Flights: नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होत आहेत. इंडिगो एअरलाइन्स नवी मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करणार असून, यामुळे प्रवाशांना सोयीस्कर प्रवास आणि वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: गेल्या काही वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर वाढलेली प्रवासीसंख्या चिंतेचा विषय राहिली आहे. अशात नवी मुंबई विमानतळ प्रवासीसंख्येचा भार कमी करण्यास उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २५ डिसेंबरपासून विमानतळावरून या नव्या विमानांचे व्यावसायिक उड्डाण सुरू होत आहे. यामध्ये नवी मुंबई-नागपूर विमानसेवेचा समावेश आहे.

    इंडिगो एअरलाइन्सद्वारे येत्या नाताळपासून नवी मुंबई-नागपूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी अजून एका विमानाची सोय झाली आहे. तसेच मुंबई उपनगरातून नागपूरला येऊ इच्छिणाऱ्या ही विमानसेवा प्रचंड उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मध्य मुंबई तसेच नवी मुंबई परिसरातून नवी मुंबई विमानतळ अधिक जवळ आणि सोयीस्कर ठरणार असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीपासूनही दिलासा मिळणार आहे. नागपूर-नवी मुंबई थेट हवाईसेवेचा सर्वाधिक फायदा विदर्भातील प्रवासी, व्यावसायिक आणि उद्योजकांना होणार आहे. या नव्या कनेक्टिव्हिटीमुळे विदर्भ-महाराष्ट्र दळणवळण अधिक सुलभ होणार असून व्यापार, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

    Maharashtra TimesNagpur News : नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सुरक्षायंत्रणा अलर्ट, तपास सुरू, सुदैवाने…

    इंडिगोने या मार्गासाठी तिकिट बुकिंग सुरू केले असून सुरुवातीचा भाडेदर अंदाजे ५ ते ८ हजारांच्या घरात असण्याची शक्यता आहे. कमी वेळेत आणि तुलनेने परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणारी ही सेवा प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरण्याची चिन्हे आहेत. नवी मुंबई विमानतळावरून सुरू होणारी ही पहिली मोठी देशांतर्गत सेवा मानली जात आहे. याशिवाय नवीन मुंबई विमानतळावरून नागपूरसाठी इतर एअरलाइन्स कंपन्यादेखील त्यांची विमानसेवा सुरू करणार असल्याची माहिती आहे. परंतु, अद्याप त्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तसेच या विमानतळावरून येत्या काळात इतर शहरांसाठीही थेट उड्डाणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीचा नवा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

    Chandrashekhar Bawankule यांनी संजय राऊतांचे धंदे काढले आणि ठाकरेंना मिश्किल टोमणेबाजी

    दिल्लीचे उड्डाण चार तास विलंबाने

    धुके तसेच तांत्रिक कारणांमुळे गुरुवारी काही प्रमाणात विमानसेवा प्रभावित झाली. विमानांचे आवागमन काहीशा विलंबाने झाले. याअंतर्गत एअर इंडियाचे एआय ४१६ हे नागपूर-दिल्ली विमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल चार तास विलंबाने उडाले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा