Nashik News : माणिकराव कोकाटेंच्या बेफिकीरीमुळे त्यांनी स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतानाच, राष्ट्रवादीचा नाशिकचा गडही संकटात आणला आहे.
नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादीचा गड राहिला आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद असून, जिल्हा परिषदेतील सत्तेपाठोपाठ राज्यात सर्वाधिक सात आमदार नाशिकमधून निवडून दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांनी नाशिक जिल्ह्याला तीन मंत्रिपदे बहाल केली आहेत. मात्र, छगन भुजबळ वगळता अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ आणि क्रीडामंत्री ॲड. कोकाटेंच्या मंत्रिपदामुळे राष्ट्रवादीला बळ मिळण्याऐवजी पक्षाचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.
Pune News : वडिलांच्या निधनानंतर पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तोडफोड, शिंदेंच्या शिवआरोग्य विभाग शहराध्यक्षावर मोठी कारवाई
ओबीसी चळवळीला बळ देणाऱ्या छगन भुजबळांना शह देण्यासाठी अजित पवार ांनी कोकांटेचा प्यादा पुढे केला. मात्र, मंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर कोकाटेंनी अजित पवार आणि पक्षाला बळ देण्याऐवजी पक्षासह स्वत:चे राजकीय भविष्यही खराब करून घेतले आहे. बेफिकिरी, नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये आणि विधिमंडळातील रमी खेळामुळे कृषी मंत्रिपदावरून पायउतार होऊन क्रीडा मंत्रिपदावर समाधान मानावे लागले. मात्र, सदनिका घोटाळा प्रकरणामुळे आता कोकाटे यांचे राजकीय भविष्यच आता टांगणीला लागले आहे.
पाच वेळा आमदारकी आणि मंत्रिपद असा दीर्घ राजकीय अनुभव असतानाही दैव देते अन् कर्म नेते अशी गत माणिकराव कोकाटे यांची झाली आहे. नाशिकचा बालेकिल्ला टिकवण्यासाठी अजित पवारांची धडपड सुरू असताना एकीकडे भुजबळ जायबंदी झालेत, तर दुसरीकडे कोकाटेंनी आपली विकेट फेकली आहे. त्यामुळे महापालिका आणि पाठोपाठ येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नाशिकचा गड गमावण्याचेही संकट पक्षासमोर उभे ठाकले आहे.
BMC Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईतील अस्तित्व धोक्यात? भाजपचा मोठा गेम प्लॅन, बडा नेता गळाला, पण ‘घड्याळ’ काटे फिरवणार
ॲड. कोकाटेंना नंदुरबारचे पालकमंत्रिपद मिळाले असले तरी त्यांचा डोळा नाशिकच्या पालकमंत्रिपदावर होता. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीचा दावा योग्य होता. मात्र, कोकाटेंना पालकमंत्रिपद मिळाले तर नाशिकवर वर्चस्व ठेवणाऱ्या भाजपच्या एका मंत्र्यासह राष्ट्रवादीतल्या एका गटाची अडचण होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतूनही भाजपच्या नेत्यांना कोकाटेंविरोधात बळ मिळाले. वादग्रस्त कोकाटे स्वपक्षीयांसह भाजपच्या चक्रव्यूहात अडकल्याने त्यांचे राजकीय भविष्य आता धूसर बनले आहे.
