उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या आठवड्यात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. हे हिवाळी अधिवेशन पंरपरेनुसार नागपूरला पार पडलं. उदय सामंत हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सक्रीय सहभाग घेतला होता. पण शनिवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजात सहभागी होता आले नव्हते. उदय सामंत रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आता अधिकृतपणे समोर आली आहे. कारण शिवसेनेचे मुख्य नेता तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांची रुग्णालयात जावून भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा देखील फोटो समोर आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबतही सविस्तर चर्चा केली. शिंदे यांनी उदय सामंत यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच सामंत यांच्या योग्य उपचार करुन लवकरात लवकर बरे करावे, अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी डॉक्टारांना दिल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या कुटुंबियांशी देखील चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आता चांगली सुधारणा झाल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. उदय सामंत यांच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना लवकरे बरे व्हा, असं म्हणत शुभेच्छा दिल्या. “उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. ही दिलासादायक बाब आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी लवकरे बरे व्हावे यासाठी राज्यभरासह रत्नागिरीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांना उद्या रुग्णालयात डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते लवकरच जनतेच्या सेवेसाठी रुजू होतील, अशी आशा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा