• Fri. Mar 6th, 2026

    Mumbai Crime: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण करुन वर्दी फाडली; कांदिवलीतील धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत

    Mumbai Crime: भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना मारहाण करुन वर्दी फाडली; कांदिवलीतील धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत

    Mumbai Crime: कांदिवलीत दोन गटांत झालेलं भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

    mumbai police(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई: कांदिवलीमध्ये शनिवारी रात्री दोन गटांमध्ये झालेली सोडविण्यासाठी हाणामारी गेलेल्या पोलिसांवरच गावगुंडांनी हल्ला केला. पोलिसांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यात आली व वर्दी फाडल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, सर्वच स्तरांतून जोरदार टीका केली जात आहे.

    या हल्ल्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. यातील अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेमुळे कांदिवली परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
    Maharashtra TimesAshish Shelar: ‘उबाठा’ने सव्वालाख कोटींचा हिशेब मुंबईकरांना द्यावा; आशीष शेलारांचे ठाकरेंना आव्हान
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिमेत एकता नगर परिसरात रात्री नऊच्या सुमारास दोन गटांत हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोबाइल चोरीच्या कारणावरून हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कांदिवली पोलिस घटनास्थळी पोहोचताच काहींनी पळ काढला, तर काही जण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

    हाणामारी रोखण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, हे सर्व जण पोलिसांच्या अंगावर धावून आले. काहींना ताब्यात घेऊन गाडीमध्ये बसविताना यातील काहींनी पोलिसांच्या वर्दीवरच हात घातला. सहायक पोलिस उपनिरीक्षक कुंभार यांच्यासह कॉन्स्टेबल खोत, कोयंडे यांना मारहाण करण्यात आली. हे सर्व व्हिडीओमध्ये चित्रित करण्यात आले असून, हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

    Maharashtra TimesMunicipal Election Announce : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले, 15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल, वाचा A टू Z कार्यक्रम
    हल्लेखोर ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. त्यांच्या मदतीने पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले, तर काही जण पसार झाले. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आत्तापर्यंत पाच जणांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा