नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर चित्रपटातील डायलॉग वापरून टीका केली. ते म्हणाले…
नेमकं काय म्हणाले शिंदे?
हमारी सारी योजना हैं गेम चेंजर, कॉर्पोरेशन का इलेक्शन जित कर हमही होंगे धुरंधर, या शायराना अंदाजात एकनाथ शिंदेंनी आज नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली आहे.
Beed Crime: काम फायनान्सचं, धंदा चोरीचा! बीड शहरात दुचाकी चोरीचा भन्नाट प्रकार उघड, मास्टरमाइंड जेरबंद, 8 गाड्या जप्त
माझं नाव घेतल्याशिवाय काहींचा दिवस सुरु होत नाही आणि संपतही नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आणि आताही मला घटनाबाह्य म्हटलं जातं. मविआच्या काळामध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते ना, कितीही म्हटलं तरी, आदळ आपट केली तरी माझं काम मी करतो. ते चालूच आहे. सर्वसामान्य घरातला व्यक्ती मुख्यमंत्री झाला म्हणून जळजळ होते, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना परत आणण्याचे काम आम्ही करु. तिजोरीला घातले वेटोळे, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांनी लुटून मुंबईचे केले वाटोळे. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकैत कोण आहेत? याचा शोध घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक रेहमान डकैत आले आणि गेले, अशा डकैताना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंचं नाव न घेता थेट टीका केली आहे.
इलाका किसका भी हो धमाका महायुतीही करेगी, असा डायलॉगही शिंदेंनी सभागृहात मारला आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या शिंदे विरुद्ध ठाकरे हा संघर्ष प्रचारात किती टोकाला जाऊ शकतो, याचीच झलक शिंदेंच्या या टीकेवरुन मिळाली आहे.
