Anna Hazare News : ज्येष्ठ समाजसवेक अण्णा हजारे यांनी आपले उपोषणास्त्र बाहेर काढलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला असून सरकारला अल्टिमेटमही दिला आहे. पण अण्णांची नेमकी मागणी काय? जाणून घ्या.
केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा व्हावा, यासाठी हजारे यांनी मोठा पाठपुरावा केला. अनेक आंदोलने केली. त्यानंतर केंद्रात लोकपाल कायदा झाला. मात्र, राज्यात लोकायुक्त कायदा होत नसल्याने हजारे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात हे विधेयक मंजूर झाले. तेव्हा हजारे यांनी सरकारचे तोंडभरून कौतूक केले होते. मात्र, पुढे याची अंमलबजावणी रखडली आहे. त्यामुळे हजारे यांना पुन्हा एकदा आंदोलन करण्याती वेळ आली आहे.
यासंबंधी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा यासाठी २३ मार्च २०१८ रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर सात दिवसांचे उपोषण करण्यात आले आणि त्यानंतर ३० जानेवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धीच्या यादबबाबा मंदिरात सात दिवसांचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर आपण कायदा करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे पाच सदस्य आणि सिव्हिल सोसायटीचे पाच सदस्य अशी संयुक्त मसुदा समिती स्थापन करून या समित्याच्या ९ बैठका झाल्या. त्यानंतर लोकायुक्त कायद्याचा मुसदा तयार करण्यात आला.
Ahilyanagar Crime: रात्रीच्या अंधारात नवरा-बायकोला गाठलं; बेदम मारहाणीत तीन लेकरांच्या बापाला… नगरात नेमकं काय घडलं?
२८ डिसेंबर २०२२ रोजी राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर १५ डिसेंबर २०२३ रोजी राज्याच्या विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. २० डिसेंबर २०२४ रोजीच्या आपल्या पत्रात या लोकायुक्त विधेयकास राज्यपालांनी मान्यता दिली आहे आणि हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा शासन करत आहे, असे पत्रात नमुद केले आहे. परंतू आपण पाठवलेल्या पत्राला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि कायदा विधानपरिषदेमध्ये मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला आहे. मात्र अद्यापही राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही.
Ahilyanagar Crime : निर्दयी कृत्याचा पर्दाफाश! नवजात बाळाला चक्क नदीत…, आई-वडील अटकेत, कारण ऐकून धक्काच बसेल
कारण हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतरही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. त्यामुळे मी विचार केला की, हार्ट अटॅकने मृत्यु येण्यापेक्षा देश आणि समाजाच्या हितासाठी मृत्यु आला तर ते माझे भाग्य समजेन. म्हणून आपणास स्मरण करून देत आहे की, आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने मी राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरामध्ये ३० जानेवारी २०२६ पासून पुन्हा माझे बेमुदत उपोषण सुरू करीत आहे, असे हजारे यांनी म्हटले आहे.
