Pune Crime : लग्नानंतर काही वर्षे सुरळीत संसार केल्यानंतर साहिलकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप पत्नीने केला.
काय आहे प्रकरण?
साहिल आणि सना (नावे बदलली आहेत) या दाम्पत्याचे २०१५ मध्ये लग्न झाले. दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली आहेत. त्यापैकी थोरली दहा वर्षांची, तर धाकटी सात वर्षांची आहे. लग्नानंतर काही वर्षे सुरळीत संसार केल्यानंतर साहिलकडून शारीरिक व मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप सनाने केला. कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून सना दोन वर्षांपासून विभक्त राहात होती. त्यामुळे साहिलने २०२१ मध्ये सनाशी घटस्फोट घेण्यासाठी पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. त्यावर न्यायालयाने दोन्ही मुलींच्या पालनपोषणासाठी दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी मंजूर केली. हा दावा सुरू असतानाच साहिलने धाकट्या मुलीच्या पालकत्वावर संशय व्यक्त करत तिच्या डीएनए तपासणीसाठी न्यायालयात अर्ज केला.
Crime News : मीनाक्षी दूर राहू लागली, 8 फेब्रुवारी 2026 तारीख कारण, पोलीस निरीक्षकाने आयुष्य संपवलं, चॅटिंगमध्ये धक्कादायक खुलासे
महिलेच्या वकिलांचं म्हणणं काय?
यावर या महिलेच्या वकील ॲड. राणी कांबळे-सोनवणे यांनी तीव्र आक्षेप घेतला. पतीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून पत्नी माहेरी राहात असून, पतीही तिथे राहात होता. पती दोन्ही मुलींचे कोडकौतुक करत होता. मात्र, आता त्याने पालकत्व तपासणीसाठी न्यायालयात अर्ज केला आहे.
Goa Nightclub Fire : पत्नीला वाचवलं, तीन मेहुणींना वाचवण्यासाठी पुन्हा आगीत शिरला, पतीसह तिघी जोशी भगिनींचा दुर्दैवी अंत
कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
पत्नीला त्रास देण्याच्या हेतूने हा अर्ज करण्यात आला आहे. पालकत्व सिद्ध करणे हे केवळ पालकांपुरते मर्यादित नसून, त्याचा मुलांच्या भवितव्यावरही विपरीत परिणाम होतो, असे सर्वोच्च न्यायालयाने न्यायनिवाड्यांत नमूद केले आहे. त्यामुळे पतीचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद पत्नीच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत कौटुंबिक न्यायालयाने पतीचा अर्ज फेटाळून त्याला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
