Ahilyanagar Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत एका जणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वादाचा स्फोट थेट हाणामारीत रूपांतर
जांभळीतील आव्हाड कुटुंबांमध्ये अनेक वर्षांपासून वैर सुरू होते. शनिवारी एका व्यक्तीच्या गावात पुनरागमनानंतर तणाव वाढला आणि काल रविवारी 11 वाजेच्या सुमारास वादाचा स्फोट झाला. फक्त बाचाबाचीनं सुरुवात झालेला वाद काही क्षणातच दगडफेक आणि शस्त्रांच्या प्रहारात बदलला. या झटापटीत दिलीप आव्हाड यांना गंभीर जखमा झाल्या. पाथर्डी येथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना अहिल्यानगरला हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यात दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे. जखमींमध्ये तेजस सोमनाथ आव्हाड, विठ्ठल भगवान आव्हाड, ज्ञानेश्वर आश्रूबा आव्हाड यांच्यासह एकूण पाच जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Accident News : सुट्टीच्या दिवशी गावी निघाले, भरधाव पिकअपची बाईकला धडक; नर्स तरुणीसह भावाचाही हृदयद्रावक अंत
जांभळीत तणाव; पोलिसांचा कडक बंदोबस्त
घटनेनंतर पाथर्डी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.डीवायएसपी नीरज राजगुरू, पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आदी अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू ठेवला.काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.गावात अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आणि दोन्ही गटांतील तणाव पाहता पोलिस गस्त वाढवली आहे.
कष्टाने संसार उभा करत असतानाच 27 वर्षीय माधुरीवर काळाचा घाला; शेतात काम करताना काळीज पिळवटून टाकणारी घटना
सततच्या छळाला कंटाळून नवऱ्याने केले असे काही
अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 4 डिसेंबर रोजी एका युवकाने आपल्याघरात गळाफास लावून आत्महत्या केली होती. या तरूणाने त्याच्या सासू-सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला जात आहे.
