• Fri. Mar 13th, 2026

    मध्यरात्री पतीचा राक्षस झाला! पत्नीला वार करून संपवलं, चारित्र्याच्या संशयातून भयंकर कृत्य

    मध्यरात्री पतीचा राक्षस झाला! पत्नीला वार करून संपवलं, चारित्र्याच्या संशयातून भयंकर कृत्य

    अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील खैरी बेड्यावर चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आसेगाव पोलिसांनी आरोपी पती जानराव भोसले याला अटक केली असून ही घटना 3 डिसेंबर रोजी रात्री घडली. जानराव ऊर्फ ज्ञान्या भोसले असं 35 वर्षीय आरोपीचं नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आसेगाव येथील खैरी बेड्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे. जानराव ऊर्फ ज्ञान्या भोसले (35) याने आपल्या पत्नी सबाना जानराव भोसले हिची चारित्र्याच्या संशयातून निर्घृण हत्या केली. आसेगाव पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी जानराव गेल्या काही महिन्यांपासून पत्नीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होता.

    स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, जानरावला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे तो सतत तिच्याशी वाद घालत असे आणि मारहाण करत असे. सबाना बेशुद्ध होईपर्यंत तो तिला मारहाण करत असे. परिसरातील लोकांनी अनेकदा भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी त्यांनाही शिवीगाळ आणि मारहाणीची धमकी देत असे. त्यामुळे कोणीही त्यांच्या घरातल्या वादात पडायला धजावत नव्हते.

    3 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 12 वाजताच्या दरम्यान, पुन्हा पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात आरोपी जानरावने सबानावर काठीने डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर निर्दयपणे वार केले. या मारहाणीत सबानाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दांपत्याला दोन लहान मुले आहेत, जी आता सबानाच्या मृत्यूनंतर आईच्या मायेला पोरकी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच आसेगाव पूर्णा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट एक्स्पर्ट यांच्या मदतीने घटनास्थळाचे पंचनामे केले आणि पुरावे गोळा केले. सकाळी आरोपी जानरावने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिस पाटील धनश्री काळे यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या हालचाली पोलिसांना कळल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

    दरम्यान, ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सूरज तेलगोटे, पोलिस उपनिरीक्षक सूरज सुसतकर, इजहार गणी, नागराज स्वामी, पंकज गावंडे, शोएब देशमुख, संभाजी टिपरे आणि राहुल चारथड यांच्या पथकाने केली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed