Thane News : आपल्याला राजकारणात राहण्याची इच्छा नसल्यानेच राजीनामा देत असल्याचे या दाम्पत्याने स्पष्ट केले आहे.
डोंबिवली, ठाकुर्ली परिसरात अनेक वर्षांपासून चौधरी पती-पत्नीचे वर्चस्व आहे. मागील अनेक वर्षे या प्रभागातून कधी श्रीकर तर कधी प्रमिला चौधरी निवडून येतात. भाजपकडून त्यांना पर्यावरण महामंडळाचे पद देण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून राजकीय घडामोडीपासून दोघेही काहीसे दूर होते. आता राजीनामा दिल्याने ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
चौधरी यांनी पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत पक्षाकडे दोन जागा मागितल्या होत्या. मात्र पक्षाने नकार दिल्यानेच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा रंगली आहे.
नांदगावमध्ये सरळ, मनमाडला तिरंगी लढत
दुसरीकडे, थेट नगराध्यक्षपदासाठी मनमाडमध्ये महायुती विरुद्ध उबाठा व राष्ट्रवादी अजित पवार गट, तर नांदगावमध्ये महायुती विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी सरळ लढत होत आहे. सत्तेत असलेले राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांचे एकमेकांना आव्हान यातूनच भुजबळ व कांदे यांच्यातील सुंदोपसुंदी अधोरेखित होत आहे.
Solapur News : अनगरमध्ये मोठा ट्विस्ट, राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित, उज्ज्वला थिटेंना दिलासा मिळणार?
आमदार सुहास कांदे यांनी पंकज भुजबळांप्रमाणेच इतिहास घडवत सलग दोनदा नांदगावमधून विधानसभेत जाण्याचा पराक्रम केला. यावेळी पंकजऐवजी माजी खासदार समीर भुजबळ यांनी लढत दिली. मात्र, कांदेंनी बाजी मारली. आता स्थानिक स्वराज्य संस्थेवर सत्ता मिळवण्यासाठी कांदे यांची धडपड असून त्यांना मनमाड व नांदगाव दोन्ही ठिकाणी भुजबळ यांच्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
Rupali Patil : श्रीकांत शिंदेंची भेट, आता अजित पवारांची साथ सोडणार? रुपाली पाटील म्हणाल्या, माझ्यासोबत…
मनमाडमध्ये भाजपबरोबर युती करून किंवा भाजपला स्वतंत्रपणे विरोधात लढवून कांदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. पण कांदे यांनी शेवटच्या क्षणी भाजपबरोबर युती करून विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले. परिणामी आता महायुती, उबाठा, राष्ट्रवादी यांच्यात लढत रंगेल.
