• Sat. Jun 6th, 2026

    किल्ल्यावर निघाली 16 विद्यार्थिनींची सहल; पण वाटेत धुक्याची चादर; बस पलटून थेट… अपघाताचे थरारक दृष्य समोर

    किल्ल्यावर निघाली 16 विद्यार्थिनींची सहल; पण वाटेत धुक्याची चादर; बस पलटून थेट… अपघाताचे थरारक दृष्य समोर

    Raigad Bus Accident: रायगडमध्ये पहाटेच्या सुमारास सहलीला निघालेल्या विकास कोचिंग क्लासच्या बसला भीषण अपघात झाला. नांदगाव परिसरात बस चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात चार विद्यार्थिनींसह

    अमुलकुमार जैन, रायगड: आज रायगडमध्ये पहाटेच्या सुमारास सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थिनींच्या बसचा भीषण अपघात झाला. इस्लामपूर, सांगली येथील ‘विकास कोचिंग क्लास’च्या 16 विद्यार्थिनी रायगड किल्ल्याच्या सहलीसाठी निघाल्या होत्या. मात्र पहाटे अंदाजे 5.30 वाजता, बस क्रमांक MH 10 AW 1122 ही नांदगाव परिसरात पोहोचताच बसचालकाचा अचानक ताबा सुटला आणि बस सरळ पलटी झाली.

    कसा घडला अपघात?

    प्राथमिक माहितीनुसार, बसचालक योगेश वसंत जाधव हे रस्त्याने सरळ न जाता पुलाखालून जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर बस घेऊन गेले होते. अंधार, अरुंद रस्ता आणि पहाटेच्या दाट धुक्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली असेल असा अंदाज आहे. या अपघातात एकूण सहा जण जखमी झाले असून त्यामध्ये चार विद्यार्थिनी, एक शिक्षक आणि खुद्द चालकाचा समावेश आहे. आदिती रवींद्र खैरमोडे(वय 16, रा. गोटखिंड, ता. वाळवा, जि. सांगली, अक्षरा अजय जाधव( वय 16, रा. भाऊची, ता. वाळवा), आदिती दीपक खाडे(वय 16, रा. भाऊची),सिद्धी दीपक ठोकळे( वय 16, रा. बावची, ता. वाळवा),जगन्नाथ विश्वास येवले( शिक्षक, वय 45, रा. गोटखिंडी, ता. वाळवा) आणि योगेश वसंत जाधव (चालक, वय 35, रा. कवठे पिराद, ता. मिरज) हे या अपघातात जखमी झाले आहेत.Maharashtra TimesNashik Accident: करोनात पतीचं निधन, पदरात 5 लेकरं, पण आईने हिंमत नाही हारली, एक चूक अन् सारं काही संपलं

    जीवितहानी नाही

    अपघातानंतर तात्काळ घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी आणि पोलीस पथकाने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना त्वरित महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; परंतु काही विद्यार्थिनींना धक्का बसल्याने वातावरणात भीतीचे सावट आहे.

    शिवसेना उबाठा-मनसे युती फिक्स, अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत मोठं विधान, वसंत मोरे म्हणाले?

    घटनेनंतर रायगड पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून, कायदेशीर तपास सुरू आहे. अपघात नेमका कसा झाला याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, अपघातग्रस्त बस रस्त्यापासून दूर पलटी झाल्याने वाहतूक सुरळीत चालू आहे. विद्यार्थिनींची सहल आनंदाने सुरू होण्याआधीच काळवंडल्याने सांगली आणि रायगड या दोन्ही ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे. पालकांना सतत मुलांच्या सुरक्षिततेची भीती असल्याने सहलींच्या आयोजनातील सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणीही होत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा