• Thu. Jun 18th, 2026
    …ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत; शिंदेंसोबत दुराव्याची चर्चा, फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    Devendra Fadnavis on Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र काही दिवसांपासून राज्यात निर्माण झाले आहे, त्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले वाचा

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आणि माझ्यात कुठलाही दुरावा निर्माण झाला नाही, तो माध्यमांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाहीत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रविवारी ते शहरात आले असता माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.

    शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र काही दिवसांपासून राज्यात निर्माण झाले आहे. शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने नाराजीच्या चर्चेत आणखी भर पडली.

    दोन खुर्च्यांचे अंतर

    देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशनने आयोजित कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदे एकत्र आलेले पाहायला मिळाले होते, मात्र दोघांमध्ये अबोला असल्याची चर्चा पुन्हा रंगली होती. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन खुर्च्यांचे अंतर दिसल्याने कुजबूज सुरु झाली होती.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : मनसे-उद्धवसेनेत वादाची ‘मशाल’ पेटली, राज ठाकरेंच्या ‘त्या’ 11 उमेदवारांवरुन धुसफूस, ठाकरे गटाकडून नाराजी मान्य
    यावेळी ‘तुमच्यात आणि शिंदे यांच्यात दुरावा आहे का’, असा प्रश्न केला असता फडणवीस म्हणाले, ‘आम्हा दोघांत कुठलाही दुरावा नाही, आम्ही आज आणि काल व त्यापूर्वीही परस्परांशी बोललो, एकत्र कार्यक्रमात सहभागी झालो होतो. ते कुठे जाणार याची मला माहिती आहे आणि मी कुठे जाणार हे त्यांना मी सांगितले आहे. कुठलाही दुरावा नाही, फक्त माध्यमांनी तसे चित्र निर्माण केले आहे. काही फुटेज दाखवून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. हा वेड्यांचा बाजार सुरू आहे. यामध्ये काही माध्यमे वेडी झाली आहेत’, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
    Maharashtra TimesSatara News : एकनाथ शिंदे दाद देईनात, चिडलेल्या बहिणीने थेट शिवसेनाच सोडली, राष्ट्रवादीचं ‘घड्याळ’ बांधलं
    उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आम्हाला मते दिली नाहीत तर निधी दिला जाणार नाही, अशी धमकी मतदारांना दिली, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘असे काहीच नाही. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचाच विकास करणार आहोत. राजकारणात व जाहीर सभेत असे बोलावेच लागते, पण त्याचा अर्थ तसा नाही’, असे फडणवीस म्हणाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा