• Fri. Mar 13th, 2026
    बारामती नगर परिषदेत आठ जण बिनविरोध, आम्ही काय त्यांना दमदाटी केली का? : अजित पवार

    Maharashtra Times

    केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला विकास करायचा आहे. देश पातळीवरच्या निवडणुका तुम्ही पाहत असाल तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बिहारमध्ये तर तेजस्वी यादवने निवडून आल्यावर प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरी देवू असे म्हंटले होते. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नाचता येईना, अंगण वाकडे, अशी विरोधकांची अवस्था झालेली आहे.बिनविरोध तर बारामती मध्येही आठ जण निवडून आले, आम्ही काय त्यांना दमदाटी केली का? असं होत नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. लातूर जिल्ह्यातील औसा येथे…नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेनंतर ते बोलत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *