• Sat. Mar 7th, 2026

    धारावीत अल्पवयीन मुलाकडून अपघात; ब्रेकऐवजी दाबला अ‍ॅक्सिलरेटर, कार थेट दाम्पत्याच्या अंगावर अन्… काय घडलं?

    धारावीत अल्पवयीन मुलाकडून अपघात; ब्रेकऐवजी दाबला अ‍ॅक्सिलरेटर, कार थेट दाम्पत्याच्या अंगावर अन्…  काय घडलं?

    Mumbai Accident: पालकांनो, तुम्हीही अल्पवयीन मुलांकडे वाहने देताय का? सावध राहा, धारावीत घडला भीषण अपघात, दाम्पत्याच्या अंगावर गाडी गेल्याने महिलेचा मृत्यू, तर पती गंभीर जखमी झाला आहे.

    car driving(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : धारावी येथे इको कार मागे-पुढे करत असताना अल्पवयीन मुलाने ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटर दाबल्याने कारने एका दाम्पत्याला धडक दिली. या अपघातात सुरेखा कदम (५६) या महिलेचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती सत्यवान हे गंभीर जखमी झाले. चालक अल्पवयीन असल्याने धारावी पोलिसांनी त्याचे वडील आणि गाडीमालकावर गुन्हा दाखल केला आहे.

    नेमकं काय घडलं?
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धारावी ओएनजीसी परिसरात संत रोहिदास मार्गावर एक दारूचे दुकान आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दुकानमालकाने मागवलेला दारूचा साठा इको कारमधून आला. चालकाने दुकानासमोर ही कार उभी केली आणि दुकानात गेला. त्याचवेळी दारूच्या दुकानमालकाचा १६ वर्षांचा मुलगा कारमध्ये जाऊन बसला. तो कार मागे-पुढे करत असताना त्याने ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटरवर पाय दिला. यामुळे कार पुढे चालत असलेल्या सुरेखा आणि सत्यवान कदम यांना धडकली. जोरदार धडक बसल्याने कदम दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

    Maharashtra Timesमुंबईत ‘मविआ’मध्ये फूट; BMC निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, रमेश चेन्नितला यांची घोषणा
    अपघाताची माहिती मिळताच धारावी पोलिस घटनास्थळी पोहोचले. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र सुरेखा यांना दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. तर सत्यवान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अल्पवयीन असल्याचे माहीत असून मुलाला गाडी चालवायला दिल्याप्रकरणी पोलिसांनी मुलासह त्याचे वडील आणि गाडीमालकावर गुन्हा दाखल केला आहे.

    Maharashtra Timesट्रान्सजेंडर गँगने तरुणाचं अपहरण केलं, नंतर सुरतला नेवून लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप, मुंबईतलं धक्कादायक प्रकरण
    वसईत शाळकरी मुलीचा उठाबशा काढल्याने मृत्यू ?

    तर दुसऱ्या घटनेत वसईतील एका शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थिनीचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. शाळेत येण्यास उशीर झाल्याने शिक्षिकेने तिला शंभर उठाबशा काढण्यास सांगितल्या होत्या. त्यामुळे प्रकृती बिघडून तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. वसई पूर्वेतील सातिवली येथे असलेल्या श्री हनुमत विद्या मंदिर शाळेत सहावीमध्ये काजल (अंशिका) गौड ही मुलगी शिकत होती. ८ नोव्हेंबरला शाळेत पोहोचण्यास तिला उशीर झाला. त्यामुळे शिक्षिकेने तिला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. बॅगेचे ओझे घेऊन तिने या उठाबशा काढल्या. यानंतर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा