Electric Belt for Leopard Attack: नवापूर तालुक्यातील सोनखांब आश्रमशाळेतील नववीच्या विद्यार्थ्याने कचऱ्यापासून केवळ १४० रुपयात ‘शेतकरी सुरक्षा कवच’ नावाचे इलेक्ट्रिक बेल्ट विकसित केले आहे.
नवापूर तालुक्यातील सोनखांब येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता नव्वीत शिकणारा जोसेफ फिलिप नाईक या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करणे, त्यांना जंगली हिंस्त्र प्राण्यांपासून, सर्पदंश, किटकनाशांच्या संपर्कामुळे होणारे नुकसान यातुन संरक्षण मिळावे यासाठी शेतकरी सुरक्षा कवच नावाचे एक स्मार्ट सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे.
भय इथले संपत नाही, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची दहशत, जखमी आणि मृतकांचा आकडा धडकी भरवणारा
या उपकरणाद्वारे शेतकऱ्याच्या गळ्यात एक बेल्ट बसवला जातो व त्याचे खांद्यावरुन कमरेला बांधलेल्या उपकरणास जोडणी राहते. जंगली हिंस्त्र प्राण्यांनी हल्ला केल्यास 300 वेंट चा झटका लागतो. त्यामुळे जंगली हिंस्त्र प्राणी त्या शेतकऱ्याला सोडून पळून जातात. यामुळे शेतकऱ्याचा जीव वाचतो आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरातून शेतीस चालना मिळेल.
140 रुपयात तयार होते उपकरण
शेतकरी सुरक्षा कवच घरात पडलेल्या विविध इलेक्ट्रिक साहित्यातून तयार केले असून त्यासाठी त्याला फक्त 140 रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे वजनाने हलके असलेले हे उपकरण सुरक्षेसोबतच उजेडासाठी बॅटरी तसेच मोबाईल ही चार्ज करता येणार असून त्यात गाणे हो ऐकण्याची सुविधा असणार आहे आणि यासाठी विजेची आवश्यकता नाही.
Vivek Kolhe | सर्व आम्ही करायचं, तुम्ही काय करणार? विवेक कोल्हे वन अधिकाऱ्यांवर भडकले
या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व जिल्हे मिळून जवळपास 396 उपकरणांचा सहभाग होता. त्यापैकी सोनखांब आश्रमशाळेच्या विद्याथ्याने मांडलेल्या उपकरणास यश मिळालेले आहे व ह्या उपकरणाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांला प्राथमिक शिक्षक कुमारयोगेश रोहिदास खर्डे यांनी मार्गदर्शन केले आहे. या विद्यार्थ्याचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जयंत नटावदकर, माजी प्राचार्या सौ.सुहासिनी सुहास नटावदकर, व प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, नंदकुमार साबळे, मुख्याध्यापक दिनेशकुमार मोरे यांनी यांनी सत्कार केला.

