Mother Ends Life: छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहित तरुणी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर आईने आत्महत्या केली. मुलीच्या बेपत्ता तक्रारीवर कारवाईसाठी पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा नातेवाइकांचा आरोप आहे.
मुलीचे विवाहबाह्य संबंध
आई रेखा राजू जाधव वय 50, रा. राम मंदिर, उस्मानपुरा असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या मुलीचा तीन वर्षांपूर्वी पहिला विवाह झाला होता. मात्र, काही कौटुंबिक कारणांमुळे घटस्फोट झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी गेल्या वर्षी मुलीचा दुसरा विवाह लावून दिला. मात्र, लग्नानंतरही मुलगी प्रियकराच्या संपर्कात होती. आठ दिवसांपूर्वी मुलगी पतीच्या घरी न सांगता प्रियकरासोबत पळून गेली. ही बाब लक्षात येताच रेखा जाधव यांनी तात्काळ उस्मानपुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी तक्रार नोंदवली नाही. उलट, कारवाईसाठी 50 हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप नातेवाइकांनी लावला आहे.
Chhatrapati sambhaji nagar: गाझातल्या युद्धग्रस्तांना मदत पाठवण्याच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? लाखो रुपये ट्रान्सफर, एटीएसने एकाला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडतंय?
नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप
या संपूर्ण प्रकाराने मानसिकधैर्य सुटलेल्या रेखा जाधव यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांना घटनेची कुणकुण लागताच त्यांनी तात्काळ रेखा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घटनेची बातमी परिसरात पसरताच नातेवाइक आणि शेजाऱ्यांचा मोठा जमाव उस्मानपुरा पोलीस ठाण्याबाहेर गोळा झाला.
संतप्त नातेवाइकांनी रेखा जाधव यांचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणून ठेवला आणि “पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे आणि पैशांची मागणी केल्यामुळेच आईचा मृत्यू झाला,” असा थेट आरोप केला. पोलीस ठाण्यात नातेवाइकांचा मोठा गोंधळ उडाला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि नातेवाइकांशी चर्चा केली.
Hind Kesari Lakhan | तीन वेळा हिंदकेसरी, १६ टू व्हीलर अन् फॉर्च्युनर, गोष्ट कोट्यधीश लखनची
दरम्यान, पूजाच्या भावाने याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रियकराच्या कुटुंबीयांमुळे आईने आत्महत्या केल्याचे नमूद करत वैभव बोर्डे, पार्वती बोर्डे, विशाल बोर्डे (रा. रमानगर), मनीषा पवार, राजेंद्र पवार, नंदू पवार (रा. शास्त्रीनगर, बुलढाणा), केसरबाई दगडू बोर्डे, गौरव बोर्डे (रा. बदनापूर) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतरच नातेवाइकांनी मृतदेह पोलीस ठाण्यातून घरी आणला.

