• Sat. Aug 8th, 2026

    Marathwada Farmers Death: शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! मराठवाड्यात 8 महिन्यांत 570 जणांनी संपवलं जीवन, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना?

    Marathwada Farmers Death: शेतकरी कवटाळतोय मृत्यूला! मराठवाड्यात 8 महिन्यांत 570 जणांनी संपवलं जीवन, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र असे असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र कायम असल्याचे विदारक चित्र आहे. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा आदी विविध कारणांमुळे गेल्या महिनाभरात मराठवाड्यात १०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. जानेवारीपासून आतापर्यंत ५७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

    मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना हा नेहमीच करावा लागतो. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईने डोके वर काढले. मान्सून सुरू झाल्यानंतरही जून महिन्यात पावसाची प्रतीक्षा करावी लागली. जुलै महिन्यात देखील अनेक ठिकाणी अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे काय होणार असा प्रश्न पडला होता. एकूणच कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर कधी मालाला भाव नाही. परिणामी, बिघडलेले आर्थिक गणिते, अशा या चक्रात अन्नदाता सापडला आहे. या व इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

    Nagpur Crime : दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटला, बाहेर जातो सांगून पुन्हा परतलाच नाही, 20 वर्षीय तरण्याबांड पोराला संपवलं; घटनेचं गूढ वाढलंजुलै महिन्यात मराठवाड्यात १०५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.यात सर्वाधिक म्हणजे २९ घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जालना जिल्ह्यात दहा, परभणी जिल्ह्यात सात, हिंगोली सहा, नांदेड जिल्ह्यात १३, लातूर मध्ये १३, तर धाराशिव जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालात नमूद आहे.

    सर्वाधिक घटना बीडमध्ये

    जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यात ५७० शेतकऱ्यांनी विविध कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली असून आत्महत्या सत्र सुरूच आहे. यात सर्वाधिक म्हणजे १२४ घटना बीड जिल्ह्यात घडल्या असून त्या खालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११९ दुर्देवी घटना घडल्या, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

    Maharashtra TimesTukaram Mundhe FDA : छ. संभाजीनगरचं पथक बीडमध्ये पोहोचलं, तुकाराम मुंढेंची थेट आपल्याच जन्मभूमीत कारवाई; छापा मारताच धक्कादायक बाबी समोरमदतीसाठी पात्र २१५ कुटुंबे

    आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत २४० प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरले आहे. २९५ प्रकरणे चौकशी वा निर्णयाकरीता प्रलंबित आहेत. तर ३५ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

    शेतकरी आत्महत्या जिल्हानिहाय माहिती
    (एक जानेवारी ते जुलै २०२६ अखेर)

    जिल्हा आत्महत्या
    छत्रपती संभाजीनगर— ११९
    जालना— ५०
    परभणी— ४१
    हिंगोली— ४१
    नांदेड— ७४
    बीड— १२४
    लातूर— ३९
    धाराशिव— ८२
    एकूण— ४६५

    शेतकरी आत्महत्या – महिनानिहाय
    महिना आत्महत्या
    जानेवारी २०२६— ७७
    फेब्रुवारी २०२६— ५९
    मार्च २०२६— ८२
    एप्रिल २०२६— ७५
    मे २०२६— ८१
    जून २०२६— ९१
    जुलै २०२६— १०५
    एकूण— ५७०

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed