Pune Leopard Attacks Farmer Bike : कल्याणनगर महामार्गावर ओतूरजवळ एका शेतकऱ्यावर चालत्या दुचाकीवर असताना बिबट्याने झडप घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
नुकत्याच घडलेल्या घटनेत कल्याणनगर महामार्गावर ओतूरजवळ एका शेतकऱ्यावर चालत्या दुचाकीवर असताना बिबट्याने झडप घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खताची गोणी घेऊन जात असलेला सिताराम निलेश डोके हा शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या आळेफाटा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून बिबट्या दुचाकीला धडक दिल्यानंतर लगेच जंगलाच्या दिशेने पसार झाल्याचे दिसते. या घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
Mumbai Crime : बापरे! मुंबईत 29 वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या अत्याचाराचा प्रयत्न, सुधीर फडके पुलाखाली ओढून नेलं आणि…
या महामार्गावर बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून यापूर्वीही मोठ्या वाहनांच्या धडकेत अनेक बिबटे मृत्यूमुखी पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीदेखील बिबटे मानवी वस्तीत शिरत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, दुसरीकडे वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, महादेव मोहिते तसेच प्रादेशिक आणि वन्यजीव विभागातील अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले असून १८००३०३३ हा टोल-फ्री क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणाली, सोलार नाईट सर्व्हिलन्स ड्रोन, कॅमेरा ट्रॅप आणि साऊंड अलर्ट सिस्टीम अशा आधुनिक यंत्रणा बसवण्यात येत आहेत.
Pune News : पुण्यात प्री-वेडिंग फोटोशूट पडलं महागात, लग्न ठरलेल्या जोडप्याला दंड, फोटोग्राफरही अडकला, कारण काय?
सध्या जुन्नर वनविभागाकडे २६२ पिंजरे उपलब्ध आहेत, मात्र वाढत्या घटनांचा विचार करून आणखी ७०० पिंजरे बाह्य एजन्सीकडून तातडीने खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामसभांमधून नागरिकांना जनजागृती करण्यासोबतच ग्रामस्तरावर “सहनियंत्रण समित्या” गठित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या समित्यांमध्ये स्थानिक अनुभवी व्यक्ती, वन आपदामित्र आणि स्वयंसेवी संस्थांचा समावेश असेल.
पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ :
या समित्यांच्या माध्यमातून ड्रोन सर्व्हे करून बिबट्यांची संख्या निश्चित करणे आणि संभाव्य धोक्याच्या क्षेत्रांची ओळख पटवणे हे काम केले जाईल. तसेच जिल्हाधिकारी डुडी यांनी पोलिस अधीक्षकांच्या पातळीवर ‘टायगर सेल’ची विशेष बैठक घेऊन विभागांमध्ये समन्वय वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जुन्नर व शिरूर भागात आतापर्यंत १२ ऑक्टोबर २०२५ पासून तब्बल १७ बिबटे जिवंत पकडण्यात आले आहेत. तरीही हल्ल्यांच्या घटनांनी प्रशासन आणि नागरिक दोघांनाही सावध केले असून, आगामी काळात अधिक कठोर आणि शाश्वत उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

