Nashik Youth Farmer End his Life : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका तरुण शेतकऱ्यानं पिकांचं नुकसान आणि कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून आपलं आयुष्य संपवलं आहे.
अशाच एका घटनेत चांदवड तालुक्यातील शिंगवे परिसरातील बजरंग नरहरी मढे या तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून सततच्या पावसामुळे झालेलं मोठं नुकसान आणि सोसायटीचं कर्ज कसं भरावं? या चिंतेतून तरुण शेतकऱ्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलं, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. त्यामुळे सरकारने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
महायुतीला धक्का! पवार काका-पुतणे एकत्र येणार; बहीण सुप्रिया सुळेंची साद, खुद्द अजित पवारांनीच…
पोटच्या पोराप्रमाणे पिकांना वाढवलं
पोटच्या पोराप्रमाणे वाढवत असलेल्या पिकाला डोळ्यासमोरच अस्मानी संकटामुळे नष्ट होताना पाहून अक्षरशः काही शेतकऱ्यांना तर अश्रू देखील अनावर झाले होते. नाशिकच्या चांदवड तालुक्याला देखील सततच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यातच आधीच अस्मानी संकटाने ग्रासलेले शेतकरी आणि त्यात अनेक शेतकरी यांच्यावर विविध बँकेचे, सोसायटीचे कर्ज देखील असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी असा मोठा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
Nanded Crime: रेल्वेत पाणी विकत होता, क्षुल्लक वाद अन् प्रवाशाने गर्दीसमोरच त्याला संपवलं, मग…; नांदेडमध्ये संताप
नाशिक जिल्ह्यात 11 महिन्यात अकरा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं
अवकाळी, गारपिटीचे अस्मानी संकट, त्यामुळे उद्ध्वस्त होणारी पिके, कर्जबाजारीपणामुळे त्रासलेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. नाशिक जिल्ह्यात चालूवर्षी आतापर्यंत 11 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. यापैकी चार आत्महत्या गेल्या सव्वा महिन्यांत झाल्या आहेत.
यंदा हंगामात मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून, त्यानंतरही अवकाळीची फटकेबाजी सुरूच राहिली. ऐन दिवाळीच्या तोंडावर अतिवृष्टीने शेतपिके उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्यातूनच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल शेतकरी उचलत आहेत.

