• Thu. Mar 12th, 2026
    मतदारयादीत काँग्रेस आमदाराचे दोनदा नाव; भाजप नेत्याने राहुल गांधींकडून मागितला खुलासा

    साटम यांनी शुक्रवारी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट करीत गौप्यस्फोट केला. साटम यांनी या पोस्टमध्ये काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

    satam gandhi(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारयाद्यांमधील घोळाबांबत अनेक आक्षेप नोंदविल्यानंतर राज्यभरात महाविकास आघाडीने राज्यात आक्रमक पवित्रा धारण केला असतानाच मुंबईतील काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांच्या नावाची दोन मतदारयाद्यांमध्ये नोंदणी असल्याचे धक्कादायक प्रकरण शुक्रवारी समोर आले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी हे प्रकरण समोर आणले आहे.

    दरम्यान, अमित साटम यांच्या आरोपानंतर शेख यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना ही निवडणूक आयोगाची चूक असल्याचे म्हटले आहे. अस्लम शेख यांचे ज्या मतदारयादीत नाव आहे, त्या मतदारयाद्यांचे फोटोही शेअर करीत साटम यांनी शेख यांना लक्ष्य केले आहे. साटम यांनी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये मतदारयादीतील सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.

    ही निवडणूक आयोगाची चूक
    माझे नाव अजून कुठल्या निवडणूक याद्यांमध्ये आहे, याबाबत मला स्वप्न पडले का माझे नाव दोन मतदारयाद्यांमध्ये असणे, ही निवडणूक आयोगाची चूक आहे. याची सर्वस्वी जबाबदारीही आयोगाचीच आहे, अशी भूमिका शेख यांनी शुक्रवार मांडली. सॉफ्टवेअरच्या मदतीने दुबार मतदार शोधणे सहज शक्य आहे, मात्र असे असताना मतदारयाद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहेत, असे शेख म्हणाले. महापालिका निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढावी अशी भावना असल्याचेही शेख म्हणाले.

    Maharashtra Timesमुंबईकरानो, स्वस्तात घर हवंय? छोटीशी चूक देखील महागात पडू शकते, वडाळ्यात 103 जणांनी कोट्यवधी गमावले
    माझ्या कार्यालयात वंदे मातरम् म्हणा
    डोळ्यांसमोर ठेऊन भाजपचे वंदे मातरम् गायनाचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. मी भाजपच्या नेत्यांना विनंती करतो, रस्त्यावर कार्यक्रम घेण्यापेक्षा माझ्या कार्यालयात कार्यक्रम आयोजित करावा, आम्ही त्यांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची की स्वतंत्रपणे, याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. पण कार्यकत्यांची भावना स्वतंत्र निवडणूक लढण्याची आहे. मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेसचाच महापौर बसेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे, असे ते म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा