• Tue. Mar 10th, 2026
    Pune Land Scam: अजित पवार यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची मागणी

    Vijay Wadettiwar On Pune Land Scam: महायुती सरकार म्हणजे तू खा, मी ही खातो आणि एकमेकांना वाचवू असे संगनमताने काम सुरू आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

    ajit pawar wadettiwar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विधीमंडळातील काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

    शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एखाद प्रकरण झाले, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित पवार हात झटकतात. आता तर पुण्यातील जमिनीचे प्रकरण आहे, त्यांच्या मुलाने व्यवहार केला आहे, प्रकरण वाढल्यावर माझा याच्याशी संबंध नाही असे बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदारी झटकू शकत नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने व्यवहार केला. या कंपनीत पार्थ पवार पार्टनर आहेत, त्यांच्या सह्या आहेत. मग गुन्हा फक्त दिग्विजय पाटील वर का दाखल झाला?
    Maharashtra TimesNagpur News: ‘शेतकऱ्यांआडून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न’, आमदार रवी राणांचा बच्चू कडूंवर घणाघात
    पुणे जमीन घोटाळाप्रकरणी आता सांगण्यात येत आहे की, दिग्विजय पाटील याला व्यवहार करण्यासाठी अधिकार देण्यात आले होते,पण व्यवहार करायला पैसे आले कुठून? व्यवहार कुणामुळे झाला? कुणामुळे स्टॅम्प ड्युटी माफ झाली? पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली पाहिजे. य

    या प्रकरणाशी सबंधित महसूल विभागाचे अधिकारी,उद्योग संचानालय, शीतल तेजवानी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले, तीन महिन्यापूर्वी कानावर आले, चुकीच्या गोष्टी मला चालणार नाही अस सांगितले होते. मग तेव्हाच पार्थ पवार यांना अजित पवार यांनी का थांबवले नाही? घरात हा व्यवहार होतो हे माहीत होते तेव्हाच थांबवले असते तर हा घोटाळा घडला नसता अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
    Maharashtra TimesAnil Deshmukh: भाजपनं मध्य प्रदेशातून कार्यकर्ते आणले, 35000 मतांची चोरी, अनिल देशमुखांच्या आरोपाने खळबळ
    मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे : आदित्य ठाकरे
    ‘पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे,’ असे उबाठा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी म्हटले. ‘एखादा उपनिबंधक किंवा निबंधक निलंबित करून विषय संपतो का? यामध्ये अनेक मोठी नावे येत आहेत, त्यात चौकशी किंवा कारवाई होणार का,’ अशी विचारणा ठाकरे यांनी या वेळी केली

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा