मुंबईत सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर येत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक आज संध्याकाळच्या सुमारास अचानक बंद पडली होती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली. अखेर रेल्वे वाहतूक सुरु होईल अशी आशा मावळल्यानंतर काही प्रवाशांनी रेल्वे रुळावर मार्गक्रमण करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान जवळपास तासाभरात रेल्वे वाहतूक सुरु झाली. पण याचा फटका प्रवाशांना बसला आहे. सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं त्यामुळेच ही अपघाताची घटना घडल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.
मुंब्रा दुर्घटना अपघात प्रकरणी दोन अभियंत्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी सीएसएमटी स्थानकावर बसून घोषणाबाजी करत आंदोलन केलं. हे आंदोलन आज संध्याकाळी 5.40 च्या सुमारास सुरु झालं होत. ते 6.40 पर्यंत सुरु होतं. या आंदोलन काळात मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. पण वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं. यानंतर हळहळू एक-एक लोकल ट्रेन सुरु झाली. पण यानंतर मोठी दुर्घटना घडल्याची माहिती आहे. सँन्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली आहे. तीन ते चार जणांचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सँन्डहर्स्ट रोड स्थानक परिसरात तीन प्रवासी रुळांवर चालत होते. या दरम्यान रेल्वे धडकेत काही प्रवाशांचा अपघात झाला. सुरुवातीला यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. यानंतर आता तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Mumbai Local : रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुंबईची लोकल थांबवली, मध्य रेल्वेची वाहतूक 50 मिनिटं थांबली, अखेर…
मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांवर प्रचंड गर्दी
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास एक तास मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे सीएसएमटी, दादर, ठाणे, कुर्ला, घाटकोपर अशा विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड मोठी गर्दी निर्माण झाली आहे. एक तास गाड्या उशिराने असल्याने प्रवासी मिळेल त्या लोकलने घरी जाणं पसंत करत आहेत. पण यामुळे ट्रेनमध्ये खचाखच गर्दी भरली जात आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर देखील मोठी गर्दी जमा होत आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, आजच्या घटनेत तीन जणांच्या मृत्यूला सरकार कुणाला कारणीभूत ठरवणार? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा