• Sun. Mar 8th, 2026
    Raigad Accident : साईडपट्टीचा अंदाज चुकला, घाटातून जाताना शिवाजी डेरे बाईकसह 100 फुट दरीत कोसळले, डोकं आपटलं अन्…

    Varandha Ghat Accident : रायगडमधील वरंधा भोर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. एक दुचाकीस्वार 100 फुट खोल दरीत कोसळ्यानं त्यांचां जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

    वरंधा घाट अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रायगड : रायगडमधील वरंध घाटात आज बुधवारी एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंधा भोर घाटात एका दुचाकीस्वाराचा 100 फूट वरून कोसळल्यानं जागीच मृत्यू झाला. हा व्यक्ती मुंबईवरून भोर तालुक्यातील शिळींब या मूळगावी जात असताना घाटातील साईटपट्टीचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट 100 फुट खोल खाली कोसळली. या व्यक्तीची ओळख पटली असून त्यांचं नाव शिवाजी डेरे असं आहे. ते भोर तालुक्यातील शिळींब गावाचा रहिवासी होते. त्यांची दुचाकी साईडपट्टी सोडून खाली आल्यानं शिवाजी डेरे घसरुन खालच्या रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी महाड एमआयडीसीचे पोलीस दाखल झाले असून या घटनेची सखोल चौकशी करत आहेत.

    खडताळ पुलावर अपघात

    रायगड जिल्ह्यातील अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशीच एक भीषण दुर्घटना अलिबागपासून काही अंतरावर असलेल्या खडताळ पुलावर 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री उशिरा घडली होती. स्कूटी आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दोघं तरुण गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान स्कूटीचालक सागर राजेंद्र जोशी (वय 25, रा. गोंधळ पाडा, अलिबाग) याचा आज पहाटे पनवेल येथील एम.जी.एम. रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    Maharashtra TimesSatara Crime: सातारा डॉक्टर तरुणी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; PSI गोपाळ बदनेला आयुष्यभराची अद्दल

    पहाटे उपचारादरम्यान मृत्यू

    अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परतेनं दोघांनाही अलिबाग ग्रामीण रुग्णालयात हलवलं. मात्र, स्थिती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल एम.जी.एम. रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यापैकी सागर जोशी याने उपचारादरम्यान प्राण सोडला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे खडताळ पूल परिसरात सिग्नल, स्पीडब्रेकर आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी पुन्हा केली आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात झाले असल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांचे पालन करावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा