Pune Crime News: पुण्यातील बाजीराव रस्त्यावर भरदिवसा मयंक खराडे या तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी टोळी युद्धात रिक्षाचालकाची हत्या झाल्याने शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यात सध्या पोलिसांचा वचक राहिलाय का असा प्रश्न उभा राहतो आहे. त्याच कारण म्हणजे पुण्यामध्ये आज दिवसाढवळ्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मयंक खराडे असं या हत्येत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्या हत्येच कारण अजून समोर आलेलं नाही, पण दोनचं दिवसांपूर्वी पुण्यात टोळी युद्धाच्या पार्श्वभूमितून एकाची हत्या झाली होती.
Satara News: निंबाळकरांमध्ये आरोपांच्या फैरी, मास्टरमाइंडवरुन रामराजेंचा रणजितसिंहांना इशारा, म्हणाले, ‘अंगाशी आलं की…’
दोन दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाची गोळ्या झाडून भयंकर हत्या करण्यात आली होती. दिवसेंदिवस पुण्यातील टोळीयुद्ध थांबायचं नाव घेत नाही. पुणे पोलिस सांगत आहेत की आम्ही पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, सध्या हत्या झालेल्या घटनास्थळावर पोलिस पंचनाम्यासाठी दाखल झाले आहेत. याठिकाणी पोलिस टीमकडून पाहणी केली जात आहे. याठिकाणी नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकारी या घटनेची माहिती मिळवत आहेत. ही हत्या नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आली आहे हे सध्यातरी समोर आलेले नाही. मात्र हत्या टोळी युद्धातून झाली का असा अंदाज आता व्यक्त करण्यात येत आहे. यामागचं कारण म्हणजे जिथे हत्या झाली आहे. त्या घटनास्थळावर कोयता आढळून आला आहे. खून्यांनी मयांकवर कोयत्याने सपासप वार करत त्याला संपवलं आहे. प्राथमिक माहितीनुसार हा तरुण अंबीलवाडा परिसरात राहणारा होता, त्याची हत्या कोणत्या कारणाने करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी तपासचक्र फिरवली आहेत.
त्यामुळे पुण्यातला बाजीराव रस्ता हा प्रचंड रहदारी असलेला रस्ता आहे. या रस्त्याच्या मध्यभागी मयांक खराडे या व्यक्तीची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे हे पाहायला मिळत आहे.

