Sindhudurg News : दिवाळीच्या सुट्टीत मुंबईतून कोकणात आलेल्या नातेवाईकांसोबत दुर्दैवी घटना घडली असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्याकडे दिवाळीसाठी मुंबई विरार येथील नातेवाईक अंजली प्रकाश गुरव (वय-30), गौरी प्रकाश गुरव (वय-18), गौरव प्रकाश गुरव (वय-21), करिश्मा सुनील पाटील (वय-16), दुर्वेश रवींद्र पाटील (वय 9) हे पाच जण आले होते. हे सर्वजण सोमवारी सायंकाळी गोवेकरवाडी रस्ता लगतच्या चिरेखाणीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले.
Raigad News : कोकणात दोन गावांना जोडणारा पूल कोसळला; मधोमध दोन भाग, वाहतूक ठप्प, ग्रामस्थांचे हाल
राहुल भिसे ठरला देवदूत
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण बुडू लागल्यानंतर एकच आरडाओरड सुरू होता. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे तरुणाने पाहिला. त्याने धाडस करून पाण्यात उडी घेतली. तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह इतर तीन मुलांना वाचवलं. यामुळे अनेकांचा जीव वाचला. दुर्दैवाने या घटनेत एका 16 वर्षीय तरुणीचा बुडाल्याने मृत्यू झाला आहे. करिश्मा पाटील असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. तर वाचवण्यात आलेल्या एका 30 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरी एमआयडीसीमध्ये भूखंड घोटाळा? ठाकरे गटाचे उपनेते बाळ माने यांचा खळबळजनक आरोप
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जितेंद्र पेडणेकर, अनुप हिंदळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, धुरी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली. बुडून मृत्यू झालेल्या करिश्मा पाटील या मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या घटनेची नोंद मालवण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप करत आहेत

