• Wed. Sep 9th, 2026
लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही… कर्जमाफीवरुन सोलापुरातील शेतकरी गरजले!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या आंदोलनानंतर सरकारने उच्चाधिकार समिती स्थापन करून शेतकऱ्यांना…कर्जमाफी देणार असा शब्द दिला आहे. यावरुन दक्षिण सोलापूरमधील वांगी….गावातील शेतकरी व्यथा मांडत असताना म्हणाले, बँका आठ महिने थांबतील का? मार्च एप्रिल अगोदर बँकाच्या नोटीसा सुरू होतात, बँकाना सांगा आठ महिने थांबायला. सोलापुरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, अद्यापही मदत मिळाली नाहीये.आठ महिन्यानंतर शेतकरी कर्जमाफी होईल की नाही यावर आम्हाला विश्वास नाही.लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed