शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी बच्चू कडू आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारकडून बच्चू कडूंना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात येत आहे. सरकारच्या शिष्ट मंडळाने बुधवारी (२९ ऑक्टो.) कडूंची नागपुरात भेट घेतली. सरकारच्या मंत्र्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांशी फोनवरून परिस्थितीची माहिती दिली.कडूंनी संपूर्ण कर्जमुक्ती व मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याची मागणी ठामपणे मांडली.