• Sun. Mar 8th, 2026

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा, भाजपचे शून्य, शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण महापौर दुसराच, काय घडलेलं?

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा, भाजपचे शून्य, शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण महापौर दुसराच, काय घडलेलं?

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागांवर यश मिळालं होतं. तर भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. असं असलं तरी शिवसेनेला महापौरपद मिळालं नव्हतं.

    छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीचा निकाल काय होता?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. आगामी महापालिका निवडणुका या वेगळ्या असणार आहेत. कारण यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागले गेले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष असणार आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष सर्वांवर भारी पडतो? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा इतिहास आपण जाणून घेऊयात. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत कोणी बाजी मारली होती? ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.

    छत्रपती संभाजीनगर (पूर्वीच औरंगाबाद) शहरासाठी 1936 मध्ये नगर परिषदेची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर शहराची लोकसंख्या आणि वाढता विकास यावरून 9 डिसेंबर 1982 रोजी नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आलं. महानगरपालिका स्थापन झाल्यापासून 1982 ते 1987 या सुरुवातीचे 5 वर्ष प्रशासक नेमून महानगरपालिकेचा कारभार चालवण्यात आला.

    महापालिकेच्या स्थापनेनंतर 1988 मध्ये पहिली निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, मुस्लिम लीग, अपक्ष आणि छोटे-मोठे पक्षांनी निवडणुकीत सहभाग नोंदवला. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला भरभरून यश मिळालं. पहिल्याच निवडणुकीत तब्बल 27 नगरसेवक निवडून आले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई, ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत शिवसेनेला हे मोठे यश होतं.
    Maharashtra Timesसरकारचं टेन्शन वाढवणारी मोठी बातमी, बच्चू कडूंच्या आंदोलनात आता मनोज जरांगेंची एन्ट्री, मुख्यमंत्री उद्या कर्जमाफीचा निर्णय घेणार?
    शिवसेना पाठोपाठ भारतीय काँग्रेस पार्टीचे 15 नगरसेवक, मुस्लिम लीगचे 10, अपक्ष इतर छोटे मोठे मिळून 8 नगरसेवक असे 60 नगरसेवक निवडून आले. आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता.
    Maharashtra Timesफलटण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, डॉक्टर तरुणीसोबत काय घडलं? सुषमा अंधारेंचे विचारात पाडणारे दावे
    शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असतानाही शिवसेनेला महापौर पदापासून दूर राहावे लागले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग आणि काही अपक्ष मिळून काँग्रेसने महापौर पदाचा दावा केला. यात काँग्रेसकडून क्रांती चौक वार्डातून निवडून आलेले नगरसेवक डॉ. शांताराम यशवंतराव काळे यांचं नाव महापौर पदासाठी सुचवण्यात आलं. यामुळे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पहिले महापौर डॉ. शांताराम यशवंतराव काळे झाले होते.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा