निळेश घायवळ टोळीचा आणखी एक धक्कादायक कारणामा उघडकीस आला आहे. या टोळीने फसवणुकीच्या कामांसाठी निर्दोष शेतकऱ्याचे कागदपत्र वापरल्याचं समोर आलं आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. 417/2025 अंतर्गत भा.दं.वि. कलम 189(1)(2), 190, 308 (4), 126(2), 351(1)(2) अन्वये निलेश घायवळ, अमोल लाखे आणि त्यांचे साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान पोलिसांना मोबाईल क्रमांक 9370622951 या क्रमांकाचा वापर या गुन्ह्यात झाल्याचे आढळले. हा मोबाईल क्रमांक सुरेश ढेंगळे यांच्या नावावर नोंद असल्याचे पोलिसांना समजल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. तेव्हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार समोर आला.
सुरेश ढेंगळे हे शेतकरी असून, २०१९ मध्ये त्यांच्या ओळखीतील अमोल लाखे (रा. लाखणगाव, ता. वाशी) याने “तुला शेतीसाठी लोन मिळवून देतो, माझ्या पुण्यात मोठ्या ओळखी आहेत, निलेश घायवळ माझा मित्र आहे, जमले तर तुला नोकरीही लावतो,” असे सांगून पुण्यात बोलावले.
ढेंगळे पुण्यात आल्यानंतर वारजे पुलाखाली भेट घेत अमोल लाखे याने त्यांच्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, शेतीच्या कागदपत्रांच्या प्रती, पासपोर्ट फोटो आणि इतर माहिती घेतली. मात्र लोन मंजुरीचा काहीच तपास लागला नाही.
तपासात समोर आले की, लाखे याने ढेंगळे यांच्या नावावर जिओ सिमकार्ड (क्रमांक 9370622951) घेतले आणि ते त्याच्या एचडीएफसी बँक खाते (क्र. 16102023697703447) तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक खाते (क्र. 80076964494) शी लिंक केले. या सिमकार्डचा वापर नंतर निलेश घायवळच्या गुन्हेगारी कारवायांसाठी केला गेला असल्याची संशयित माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
शेतकऱ्याचा आरोप : “माझा विश्वासघात झाला”
सुरेश ढेंगळे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे, “अमोल लाखे याने माझा विश्वास संपादन करून माझ्या कागदपत्रांचा गैरवापर केला. त्याने माझ्या नावावर सिमकार्ड घेतलं आणि त्या सिमचा वापर निलेश घायवळच्या नेटवर्कसाठी केला. माझी फसवणूक झाली आहे.”
या प्रकरणानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी घायवळ टोळीविरुद्ध सुरू असलेला तपास अधिक गतीमान केला आहे. सदर सिमकार्डद्वारे गुन्ह्यातील संवाद, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल ट्रेल्स तपासले जात असून, या मार्गाने घायवळ टोळीचे आणखी संपर्क उघड होण्याची शक्यता आहे.
“अमोल लाखे हा निलेश घायवळचा जवळचा सहकारी आहे. त्याच्याद्वारे अनेक व्यवहार आणि ओळखी हाताळल्या जातात. या प्रकरणात मिळालेल्या सिमकार्ड आणि बँक लिंकिंगच्या पुराव्यांमुळे तपास निर्णायक टप्प्यावर आहे”, अशी माहिती देण्यात आली आहे.
कुख्यात निलेश घायवळ याच्यावर आधीच हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकी आणि आर्थिक गुन्ह्यांचे अनेक गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर रेड आणि ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली असून, त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. अलिकडेच पोलिसांनी यूके हायकमिशनला पत्र पाठवून घायवळला भारतात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एकंदरीत, निर्दोष शेतकऱ्याच्या कागदपत्रांचा वापर करून निलेश घायवळ टोळीने फसवणूक आणि गुन्हेगारी व्यवहारांसाठी वापर केल्याचा उघड झालेला प्रकार हा पुणे पोलिसांसमोर नवा कोडे घेऊन आला आहे. या घटनेमुळे घायवळ टोळीचे “डिजिटल नेटवर्क” आणि फ्रॉड ऑपरेशन्सचे नवे धागे समोर येण्याची शक्यता वाढली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा
