• Sat. Mar 7th, 2026

    Bacchu Kadu Farmers Protest : ‘जोपर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत…; बच्चू कडू अन् समर्थकांचं ‘रेल रोको’ आंदोलन, वाहतूक ठप्प

    Bacchu Kadu Farmers Protest : ‘जोपर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत नाही, तोपर्यंत…; बच्चू कडू अन् समर्थकांचं ‘रेल रोको’ आंदोलन, वाहतूक ठप्प

    Bacchu Kadu Protest Nagpur : बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी आज नागपुरात मोठे रेल्वे रोको आंदोलन सुरु केलं आहे. समर्थकांनी सकाळपासून रेल्वे ट्रॅकवर उतरुन घोषणाबाजी केली असून संपूर्ण वाहतूक विस्कळीत केली आहे.

    बच्चू कडू आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये तीव्र आंदोलन छेडलं आहे. नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावर ‘रेल रोको’ आंदोलन करत प्रहार कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, ‘जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील’.

    रेल्वे वाहतुकीवर परिणाम

    आज सकाळपासूनच नागपूर मुंबई रेल्वे मार्गावर मोठ्या संख्येने प्रहार कार्यकर्ते जमले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, थकलेली कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य दर न मिळाल्याच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून नागपूर-मुंबई मुख्य मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प केली आहे. यामुळे नागपूरहून मुंबईकडे आणि विदर्भातील इतर शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

    Maharashtra Timesजपून ठेवलेली CD गायब, पेनड्राइव्ही गेला, बंगल्यातून काय-काय चोरीला? खडसेंनी सगळं सांगितलं

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील

    प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘सरकारला आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आम्ही मुंबईला जाणार नाही. उलट सरकारने नागपूरला यावं आणि येथेच चर्चेद्वारे निर्णय घ्यावा.’ त्यांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलं की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील असूनही, विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकार अपयशी ठरले आहेत.’

    बच्चू कडू यांनी पुढे सांगितलं की, ‘सरकारने आजच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस घोषणा करावी. अन्यथा आंदोलन आणखी उग्र केलं जाईल आणि राज्यभर रेल्वे वाहतूक ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात येईल.’

    दरम्यान, पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आंदोलनकर्त्यांना वारंवार विनंती करूनही ते मागे हटायला तयार नव्हते. मात्र विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरून हटवण्यात आलं. प्रहार संघटनेच्या या आंदोलनामुळे नागपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र आंदोलन थांबवण्यासाठी चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे.

    Maharashtra Timesसावधान! पक्षाघाताचा धोका वाढतोय, ‘ही’ लक्षणं आढळल्यास वेळीच सावध व्हा, स्ट्रोक नेमका कशाने होतो? डॉक्टरांनी सांगितलं कारण

    बच्चू कडू यांच्या कोणत्या मागण्या?

    1. नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
    2. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
    3. मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
    4. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.
    5. दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
    6. शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
    7. कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
    8. पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा