• Mon. Jun 15th, 2026
    17 तासांचा निर्जळी उपवास, विरारच्या 33 वर्षीय विवाहितेला स्ट्रोक, डॉक्टर म्हणाले, कोव्हिड काळात…

    Virar Woman Stroke by Dehydration : कोरोना काळात लसीकरण आणि संसर्ग यामुळे विशेषतः तरुणांमध्ये स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली, असं डॉक्टर

    पालघर : १७ तास निर्जळ उपवास करणं ३३ वर्षीय महिलेला चांगलंच महागात पडलं. विरारमधील विवाहितेला पाणी न पिता उपवास केल्यामुळे स्ट्रोक आला. कोविडची लागण आणि लसीकरणामुळे तरुणवर्गात स्ट्रोकचा धोका वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

    संबंधित महिलेने करवा चौथच्या दिवशी उपवास केला होता. उपवास सोडल्यानंतर लगेचच तिला स्ट्रोक आला. तिच्या चेहऱ्याच्या एका भागाला लकवा आला आणि तिला वॉटर प्युरिफायरही चालू करता येईना, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे महिलेच्या पतीने सांगितलं.

    मीरा रोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांनी संबंधित महिलेवर उपचार केले. ते म्हणाले की, “कोरोना काळात लसीकरण आणि संसर्ग यामुळे स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये वाढ झाली, विशेषतः तरुणांमध्ये” कोविडमुळे होणारे स्ट्रोकचे प्रमाण आता कमी झाले असले तरी ते पूर्णपणे संपलेले नाही. स्ट्रोक हा देशातील मृत्यू आणि अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. दर १ लाख लोकांमागे १०३ जणांना स्ट्रोक होतो.

    १० ऑक्टोबर रोजी करवा चौथच्या दिवशी ही महिला सकाळी ४ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत उपवास करत होती. उपवास सोडल्यानंतर लगेचच तिला स्ट्रोकचा झटका आला. तिच्या पतीने सांगितले की, “ती मला पाणी आणून देत होती, तेव्हाच मला दिसले की तिचा चेहरा एका बाजूला लटकत आहे. आम्ही हेही पाहिले की तिला वॉटर प्युरिफायर चालू करता येत नव्हते.” तिच्या पतीने तिला लगेच जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे स्ट्रोक असल्याचे निदान झाले, पण त्यांच्याकडे न्यूरोलॉजिस्ट नव्हते. त्यामुळे तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तिला एक थ्रोम्बोलाइटिक इंजेक्शन देण्यात आले आणि त्यानंतर तिला वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

    डॉ. पै यांनी सांगितले की, “इमेजिंग तंत्रज्ञानाने असे दाखवले की तिच्या मेंदूच्या उजव्या भागाला रक्तपुरवठा करणारी एक महत्त्वाची रक्तवाहिनी, उजवी सुप्रॅक्लिनॉइड इंटरनल कॅरोटीड आर्टरी, एका मोठ्या गुठळीमुळे ब्लॉक झाली होती.” दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता महिलेवर डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टोमी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे रक्ताची गुठळी काढून टाकण्यात आली.

    या शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती झपाट्याने सुधारली. तिच्या डाव्या बाजूच्या स्नायूंची ताकद काही तासांतच सुधारली आणि दुसऱ्या दिवशी तिला हालचाल करणे शक्य झाले. डॉ. पै यांनी सांगितले की, “संपूर्ण हृदय आणि शरीराची तपासणी केली असता, स्ट्रोकचे इतर कोणतेही कारण आढळले नाही. त्यामुळे डिहायड्रेशन हेच स्ट्रोकचे मुख्य कारण असल्याचे निश्चित झाले.” जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता होते, तेव्हा रक्त घट्ट होते आणि यामुळे कधीकधी स्ट्रोक येऊ शकतो.

    तिच्या पतीने सांगितले की, “आम्ही ७ लाख रुपये खर्च केले, पण माझ्या पत्नीचा जीव वाचला. डॉक्टरांनी सांगितले की येत्या काही महिन्यांत तिची वाचा सुधारेल.”
    Poonam Dixit : एकही दिवस काम केलं नाही, तरी 5 वर्षात दीक्षित मॅडमना 37 लाखांचा पगार, सरकारी नोकरदार नवरोबाची कमाल, प्रकरण काय?
    बीएमसी-संचालित केईएम हॉस्पिटलच्या डीन आणि न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, भारतात स्ट्रोकबद्दल जागरूकता वाढली आहे, पण अजून बराच पल्ला गाठायचा आहे. “स्ट्रोकच्या उपचारांसाठी ‘गोल्डन अवर’ म्हणजे ४.५ तास असतो. रुग्णांना या वेळेत स्ट्रोक-रेडी हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्य उपचार सुरू करता येतील. रुग्णांना लहान नर्सिंग होममध्ये नेऊ नये, कारण तिथे गुंतागुंतीच्या प्रकरणांवर उपचार करण्याची सोय नसते,” असे त्या म्हणाल्या.

    या महिलेच्या केसमध्ये, उपवासामुळे शरीरातील पाण्याची पातळी खूप कमी झाली होती. यामुळे रक्त घट्ट झाले आणि मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत क्लॉट तयार झाला. ही गुठळी मेंदूच्या एका महत्त्वाच्या भागाला रक्तपुरवठा थांबवत होती, ज्यामुळे स्ट्रोक आला. वेळेवर योग्य उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला. या घटनेमुळे निर्जलीकरणामुळे होणाऱ्या स्ट्रोकच्या धोक्याकडे लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः उन्हाळ्यात किंवा उपवास करताना शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे.
    Maharashtra TimesCrime News : तिच्यासोबत काय करत होतास अविनाश? बायकोने नवऱ्याला लॉजवर गर्लफ्रेण्डसोबत रंगेहाथ पकडलं, खेचून धू-धू धुतलं, शेवटी…
    डॉक्टरांनी लोकांना आवाहन केले आहे की, स्ट्रोकची कोणतीही लक्षणे दिसल्यास, जसे की चेहऱ्याचा एक भाग लटकणे, बोलण्यात अडखळणे किंवा एका हाताला किंवा पायाला अशक्तपणा जाणवणे, तर त्वरित रुग्णालयात जावे. वेळेवर उपचार मिळाल्यास स्ट्रोकचा धोका कमी करता येतो आणि रुग्णाचे आयुष्य वाचवता येते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed