• Sat. Mar 7th, 2026
    Devendra Fadnavis: अतिवृष्टीग्रस्तांसाठी आणखी 11000 कोटी; 15 दिवसांत खात्यात जमा होणार, CM फडणवीसांची माहिती

    Devendra Fadnavis: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अतिवृष्टीग्रस्तांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे पैसे १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    fadnavis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मदत पॅकेजचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी आढावा घेण्यात आला. अतिवृष्टीग्रस्तांसाठी आधी आठ हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जवळपास ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत. अतिरिक्त पैसे पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    अतिवृष्टीग्रस्तांसाठीच्या मदत पॅकेजचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘याआधी वितरित केलेले पैसे सुमारे ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अतिवृष्टीग्रस्तांना आणखी ११ हजार कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पुढच्या १५ दिवसांत हे पैसे खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांत हा निधी वेगवेगळ्या पद्धतीने गेला आहे. जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची असा निर्णय झाला आहे. काही ठिकाणी ‘एनडीआरएफ’ची मदत मिळाली, पण १० हजार मिळाले नाहीत असे झाले आहे. काही ठिकाणी १० हजार मिळाले, काही ठिकाणी दोन हेक्टरचे मिळाले आहेत. आता तीन हेक्टरचेही पैसे टाकतो आहोत.
    Maharashtra Times‘उद्धव ठाकरे दुसऱ्यांच्या मेहनतीवर फुत्कार काढणारे, स्वत:च्या पक्षाला गिळून टाकणारे अजगर’; चंद्रशेखर बावनकुळेंचा जोरदार पलटवार
    येत्या १५-२० दिवसांत ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. उर्वरित १० टक्के राहतील, कारण काहींच्या नोंदी, बँक खात्यात अडचणी आहेत. त्या अडचणीही सोडवू. निधीची कोणतीही कमतरता नाही. प्रक्रिया पूर्ण करताना याद्या दोन वेळा तपासाव्या लागतात. कारण कोणीही पात्र शेतकरी राहून जाऊ नये आणि अपात्र असलेल्याला मदत मिळू नये ही अपेक्षा असते. ॲग्रीस्टॅक खात्यांची आपण ई-केवायसी करत नाही.’
    Maharashtra Timesशिंदेसेनेचं ‘आरोग्य’ बिघडणार? फडणवीसांनी ‘प्रवीण’ अधिकारी नेमला; ‘मित्रा’रुपी खेळीनं अस्वस्थता
    शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा
    शेतमालाच्या खरेदीसाठी राज्यात नोंदणी सुरू केली जात असून, यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अशा नोंदणीमुळे पारदर्शकता आली असून, आता शेतक‍ऱ्यांना हमीभाव मिळत आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा