Ratnagiri Rain Update : दिवाळीनंतरही रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंबा बागायतदार यामुळे चिंतेत असून पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे.
दिवाळी झाल्यानंतरही पाऊस मागे हटण्याचं नाव घेत नसल्याने शेतकरी वर्ग ही मेटाकुटीला आला आहे. इतकंच नाही तर कोकणाची मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असते ती आंबा आणि काजू बागांवरती. आंबा बागायतदारही पाऊस लांबल्याने धास्तावला आहे. आंब्याला येणारा मोहोर पुढे जाण्याची भीती आहे. पाऊस पडल्याने पुन्हा एकदा आंब्याला पालवी फुटण्याचा धोका आहे, त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम लांबण्याची भीती आंबा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
Weather Alert: दिवाळीनंतर आता पावसाचा धमाका; राज्यभरात जोरदार कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट? संपूर्ण यादी
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात 27 ऑक्टोबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Heavy Rains in New Mumbai | नवी मुंबईत पावसाचा हाहाकार, रस्ते, रेल्वे पाण्याखाली
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरुन घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.

