• Sat. Mar 7th, 2026
    Ratnagiri Rain : कोकणात पुढील दोन दिवस वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

    Ratnagiri Rain Update : दिवाळीनंतरही रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वारे, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंबा बागायतदार यामुळे चिंतेत असून पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात दिवाळीपासून पुन्हा एकदा पावसाने दररोज संध्याकाळी जोरदार हजेरी लावली आहे. समुद्रामध्येही वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाने कोकणात शेतकरी आणि मच्छीवारांचंही नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन विभागाचे फोननंबर जारी करण्यात आले आहेत.

    दिवाळी झाल्यानंतरही पाऊस मागे हटण्याचं नाव घेत नसल्याने शेतकरी वर्ग ही मेटाकुटीला आला आहे. इतकंच नाही तर कोकणाची मोठी अर्थव्यवस्था अवलंबून असते ती आंबा आणि काजू बागांवरती. आंबा बागायतदारही पाऊस लांबल्याने धास्तावला आहे. आंब्याला येणारा मोहोर पुढे जाण्याची भीती आहे. पाऊस पडल्याने पुन्हा एकदा आंब्याला पालवी फुटण्याचा धोका आहे, त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम लांबण्याची भीती आंबा बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.
    Maharashtra TimesWeather Alert: दिवाळीनंतर आता पावसाचा धमाका; राज्यभरात जोरदार कोसळणार, कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट? संपूर्ण यादी
    मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात 27 ऑक्टोबर 2025 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह आणि वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत विजा चमकत असताना खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात, असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

    Heavy Rains in New Mumbai | नवी मुंबईत पावसाचा हाहाकार, रस्ते, रेल्वे पाण्याखाली

    हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in/ या संकेतस्थळावरुन घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02352) 222233 / 226248 किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क करा.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा