• Fri. Mar 6th, 2026

    ‘शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर…’; शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याच्या वक्तव्यावरुन प्रताप सरनाईकांचा संजय राऊतांवर जोरदार पटलवार

    ‘शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर…’; शिवसेना भाजपमध्ये विलीन करण्याच्या वक्तव्यावरुन प्रताप सरनाईकांचा संजय राऊतांवर जोरदार पटलवार

    Pratap sarnaik on sanjay raut: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, संजय राऊत यांच्या एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरील टीकेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक राजकारणातले अनेक मोठे चेहरे आता पक्षांतरेही करताना दिसत आहेत. तर मोठे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी दोन्ही प्रमुख आघाड्या या निवडणुकांना एकत्रपणे सामोरे जाणार की नाही या प्रश्नाचं उत्तरही अजूनतरी अनुत्तरीतचं आहे.

    दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला बैठकीला जात आहेत, याचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ते त्यांचा पक्ष विलीन करणार आहेत. यावर आता परिवहन मंत्री व शिंदेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “संजय राऊत यांना स्वप्नं पडत असतात. कधी राहुल गांधी पंतप्रधान झाल्याचं, तर कधी मुंबई महापालिकेवरती सत्ता आल्याचं, तर कधी स्वतः मुख्यमंत्री झाल्याचे स्वप्न संजय राऊतांना पडतं आणि ते दिवसा त्या गोष्टी बोलत असतात.”, असा जोरदार पलटवार सरनाईकांनी केला आहे.
    Maharashtra TimesNanded News: ‘मंगल माझ्याशी लग्न कर!’; दहा वर्ष मोठ्या प्रेयसीशी करायचे होते लग्न, नकार मिळाल्याने घेतला जीव, नांदेडमध्ये खळबळ

    महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार

    नितेश राणे राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा हे युतीबाबत निर्णय घेतात. नितेश राणे किंवा अजून कोणी काही म्हटलं तरी यावरती काहीही परिणाम होत नाही. येणाऱ्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार, असं सरनाईक म्हणाले आहेत.

    आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, असा प्रश्न विचारला असता “ठाकरे बंधू नाही ,अनेक ठाकरे आहेत. सगळ्यांनी एकत्र आले तर काय, ठाकरे कुटुंब मोठे आहे. त्याचबरोबर कुटुंब म्हणून पवार कुटुंबांनीदेखील एकत्र आले पाहिजे”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

    हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

    मात्र कोणीही एकत्र आलं तर महायुतीला धक्का बसणार नाही, असं कधीही होणार नाही, शिंदे साहेबांच्या ठिकऱ्या उडवायचा विचार केला तर, शिंदे साहेब टिपऱ्या त्यांच्या हातात देतील, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. दरम्यान, पंढरपूरमध्ये कार्तिक वारीच्या नियोजनासाठी आज पंढरपूरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आले होते. तेव्हा त्यांनी हा पत्रकारांशी संवाद साधला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा