Raigad News : रायगड जिल्ह्यातील नेरळ परिसरात मिठाई व्यावसायिक मल्हार गोविंद सोनावळे यांना कार चालवत असताना हृदयविकाराचा झटका आला. कारचा ताबा गेला आणि काहीवेळात कार एका ठिकाणी धडकली त्यावेळी एअरबॅगही उघडल्या होत्या, पुढे काय घडलं जाणून घ्या.
मिठाई बनवण्याच्या कलेत निपुण असलेले आणि आपल्या हसतमुख स्वभावामुळे मल्हार सोनावळे हे नेरळ परिसरात खूप लोकप्रिय होते. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण नेरळ आणि पिंपळोली परिसरात शोककळा पसरली आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.
Karjat Bull Attack: थरारक! कर्जतमध्ये बिथरलेल्या बैलाचा हैदोस; 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, तिघे जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, मल्हार सोनावळे हे नेरळमधील आपले काम संपवून पिंपळोली येथील घरी परतत होते. गुडवण-सुगवे रस्त्याने जात असताना त्यांना अचानक त्रास जाणवला. यामुळे त्यांची कार रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाच्या गाळ्यात घुसली. हा अपघात इतका जोरदार होता की गाळ्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे मल्हार यांना बाह्य जखमा झाल्या नाहीत.
Raigad Crime : उच्चभ्रू सोसायटीत १३ मजल्यावर लाल रंगाच्या फडक्यातील पिठाच्या बाहुलीने खळबळ, तिथेच काही दिवसांपूर्वी… नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना कारमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

