• Wed. Jun 17th, 2026

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास होणार जलद! 10 पदरी सुपर हायवेचा प्रस्ताव मंजूर; जाणून घ्या कधी होणार काम पूर्ण

    मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रवास होणार जलद! 10 पदरी सुपर हायवेचा प्रस्ताव मंजूर; जाणून घ्या कधी होणार काम पूर्ण

    Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 10 पदरी सुपरहायवे होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. सुमारे 14,260 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून पूर्ण केला जाईल.

    मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) या महत्त्वाच्या महामार्गाचे 10-पदरी सुपरहायवेमध्ये रूपांतर करण्याची तयारी करत आहे, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

    पूर्वी या महामार्गाला केवळ आठ पदरी करण्याची योजना होती, परंतु आता त्यात सुधारणा करून 10 पदरी विस्तार केला जाणार आहे. 10 पदरी विस्तारासाठी अतिरिक्त 1,420 कोटी रुपये खर्च येणार असून, एकूण बांधकामाचा खर्च 8,440 कोटी रुपये होईल. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, एकूण प्रकल्प खर्च सुमारे 14,260 कोटी रुपये होईल. मंजूरी मिळाल्यास, वाढत्या वाहनांच्या संख्येशी जुळणारा हा भारतातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे अपग्रेडपैकी एक असेल.

    Maharashtra Times‘मा‍झ्या मुलीला प्राणी खूप आवडतात’, दिवाळीनिमित्त दीड वर्षीय मानसीला घेऊन गेले फिरायला; पण आई वडिलांच्या डोळ्यांदेखतच…

    कधी होणार काम पूर्ण?

    एमएसआरडीसीच्या दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, “या कामासाठी सुमारे तीन वर्षे लागतील. जर काम 2026 पर्यंत सुरू झाले, तर 2029-30 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.” प्रकल्पासाठी निधी ठरवण्यासाठी ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेल’अंतर्गत प्रस्ताव दिवाळीनंतर सादर केला जाणार आहे. या मॉडेलमध्ये सरकारी आणि खासगी कंपन्या एकत्र काम करतील, जिथे सरकार बांधकाम खर्चाच्या 40% निधी देईल आणि खाजगी विकासक उर्वरित 60% गुंतवणूक करतील. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कौशल्य आणि खाजगी क्षेत्रातील कार्यक्षमतेचे संतुलन साधले जाईल.

    हा 94.6 किमी लांबीचा प्रवेश-नियंत्रित महामार्ग 2002 मध्ये सुरू झाला आणि नवी मुंबईतील कळंबोली ते पुण्याजवळील किवळे जोडतो. आठवड्याच्या दिवशी सुमारे 65,000 वाहने आणि आठवड्याच्या शेवटी एक लाखाहून अधिक वाहने या मार्गावरून जातात, तर दरवर्षी वाहतुकीत 5-6% वाढ होत आहे. सध्या 13 किमी लांबीच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम सुरू आहे, ज्यात खंडाळा घाटातील 10 पदरी भाग समाविष्ट आहे. प्रस्तावित विस्तारात ई-वेच्या उर्वरित भागावर लक्ष केंद्रित केले जाईल.

    धनंजय मुंडेंच्या गोड बोलण्याला फसू नका; संतोष देशमुख, महादेव मुंडेंचं नाव घेत करुणा शर्मांचा निशाणा

    एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार, आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी, दोन तासांच्या प्रवासात अजून एका तासाची वाढ व्हायची. पण ही समस्या या विस्तारीकरणामुळे सुटणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा