Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून त्याचे मृतदेह तुकडे तुकडे झाले होते. या घटनेनंतर आता हा वाघ खुलेपणाने संचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय घडलेली घटना
गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी गावातील शेतकरी भाऊजी पाल यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांचा निर्घृणपणे जीव घेतला आहे. अधिक भीषण बाब म्हणजे, वाघाने शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते तुकडे शेत परिसरात विखुरलेले अवस्थेत सापडले आहेत. शेतकरी भाऊजी पाल हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलांना शेतात चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यांनी बैलांना चारण्यासाठी मोकळे सोडले आणि घरी परत आले.
रायगड जिल्हा परिषद घोटाळा: सहआरोपींनी टाकलेल्या दबावामुळे एकाची आत्महत्या; चिठ्ठीतून झाला खुलासा, दोघांवर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
सायंकाळी ते पुन्हा बैलांना परत आणण्यासाठी शेताकडे गेले, परंतु ते रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला, पण काहीच पत्ता लागला नाही. कुटुंबीयासह गावकऱ्यांनी शोधमोहीम पुन्हा सुरू केली असता, शेताच्या परिसरात भीषण दृश्य दिसले. शेतकऱ्याच्या शरीराचे अनेक तुकडे विविध ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत सापडले. यामुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली.वाघाने शरीराचे तुकडे तुकडे केल्याच्या या प्रकारामुळे वनविभागाचे अधिकारीसुद्धा स्तब्ध झाले होते. ही घटना अतिशय दुर्दैवी असून अशा प्रकारे शरीराचे तुकडे विखुरले जाण्याची घटना या भागात पहिल्यांदाच घडली.
वाघाच्या सोबतीने काम करणारेही हादरले
खरंतर चंद्रपूर जिल्हातील शेतकऱ्यांचा सामना रोजच वन्यजीवांशी होत असतो. शेतात वाघ, बिबटे, अस्वल फिरत असताना बिनधास्त काम करणारे शेतकरी आता मात्र वन्यजीवांचा दहशतीत वावरत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
GR रद्द, पण ठाकरे बंधू एकत्र येणारच, सेना-मनसे कार्यकर्त्यांना काय वाटतं?
ताडोबासाठी आंदोलन
दरम्यान, दुसरीकडे आता ताडोब्यात देश, विदेश्यातील पर्यटक येतात. मात्र येथील तिकीट दर जिल्हातील जनतेला परवडणारे नाही. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या विरोधात आंदोलनही केलं होतं. ज्यांनी आपलं रक्त सांडवून वाघांची सुरक्षा केली त्यांच्या जीवाची पर्वा वनविभागाला नाही, असाही सुरु आता उमटत आहे.

