Diwali Mumbai Air Pollution : मुंबईत दिवाळीमध्ये वायू प्रदूषण वाढलं असून, हवा अतिशय वाईट श्रेणीत आहे. फटाक्यांमुळे प्रदूषणात सर्वाधिक वाढ झाली आहे. दोन दिवसांत हवा मध्यम ते वाईट श्रेणीपर्यंत पोहोचली आहे.
रात्री 10 पर्यंत वेळ, पण तरी 1 वाजेपर्यंत फटाके फोडले
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी हे दोन दिवस फटाके फोडण्याची परवानगी रात्री 10 वाजेपर्यंतच दिली होती. मात्र तरीही रात्री 1 वाजेपर्यंत फटाके फोडले जात होते, असा नाराजीचा सूर अनेक मुंबईकरांनी व्यक्त केला. प्रदूषणामुळे वातावरण सकाळच्या वेळीही प्रसन्न वाटत नव्हतं. हवेचा गुणवत्ता निर्देशांक मुंबईतील विविध केंद्रांवर वाईट श्रेणीत होता, यामुळे मुंबईची हवा बिघडली .
Delhi Pollution : जगातील सर्वांत प्रदूषित प्रमुख शहर ठरलं दिल्ली, वायू प्रदूषण धोकादायक पातळीवर, धुराने सूर्यही झाकोळला
बीकेसीमध्ये सर्वाधित वाईट हवा
आयआयटीएमनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये हा हवेचा निर्देशांक अतिवाईट म्हणजे 373 इतका नोंदवला गेला होता. तर, हा निर्देशांक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार वाईट श्रेणीत असल्याचं सांगण्यात आलं. बराच वेळ अशा हवेमध्ये श्वास घेतल्यास तब्येतीवर, आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाकरे बंधूंच्या भेटीचा गोड क्षण, कार्यकर्त्यांसाठी खरी दिवाळी, दीपोत्सवाची शान वाढली
फटाक्यांमुळे वायू प्रदूषण
देवनार, भायखळा, कांदिवली पश्चिम, बोरिवली पूर्व, चेंबूर, खेरवाडी, मालाड पश्चिम, चकाला, मुलुंड पश्चिम, पवई या मुंबईतील भागात हवेचा निर्देशांक वाईट होता. कानठळ्या बसवणारे फटाके नरकचतुर्दशीच्या दिवशी रात्री उशीरापर्यंत फोडले जात होते. या फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण दोन्हीचाही त्रास होत असल्याचं अनेक मुंबईकरांनी सांगितलं. फटाक्यांचे आवाज रात्र उशिरापर्यंतच्या यासंदर्भात पोलिसांकडे काही जणांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असा सोशल मीडियावर दावा केला गेला.

