Ratnagiri News : लग्न झाल्यावर दाम्पत्य रत्नागिरी येथे कामासाठी आलं होतं. गावारून आई-वडील फोन करायचे तेव्हा फक्त सूनबाई बोलायची. पण मुलगा कुठे काही सांगायची नाही, एक दिवस ती थेट बोलली पती गेलाय, तेव्हा आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयितांमध्ये एका महिलेसह मनीराम कल्लराम (४५), मनीराम यांची पत्नी (नाव माहित नाही. ४०, रा. बरसोला कला, तिकोनियों. जिल्हा खिरी, राज्य उत्तर प्रदेश) अशी तीन संशयितांची नावे आहेत. ही घटना २० जून रोजी घडली होती.
Uday Samant : ‘जर कोणाला खुमखुमी असेलच तर धनुष्यबाण कसा…’; कोकणात उदय सामंतांकडून भाजप-राष्ट्रवादीचा समाचार, कारण काय?
फिर्यादी श्रीराम श्रीपाल निवास (४५, रा. बरसोला कला, तिकोनियों, जिल्हा खिरी, राज्य-उत्तरप्रदेश) यांचा मृत्यू झालेला मुलगा भानुप्रताप रामनिवास याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार त्यांची सून फिर्यादी श्रीराम यांचा मुलगा भानूप्रताप यांच्यात नेहमीच वाद होत असत. दरम्यान, संशयित मनीराम कल्लरामच्या सांगण्यावरुन फिर्यादीचा मुलगा भानुप्रताप व त्याची पत्नी असे दोघेही कामासाठी रत्नागिरी आले होते. त्यानंतर फिर्यादी-श्रीराम निवास यांनी संशयित मनीराम याला वारंवार फोन करुन मुलाची विचारपूस करत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तसेच सुनेने पतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
Ratnagiri News: माझ्या मुलीचा खूप छळ केला, लेक गमावलेल्या आईने काय-काय सांगितलं? रत्नागिरी विवाहिता मृत्यू प्रकरणात नवी माहिती
दरम्यान, २० जून २०२५ ला संशयित मनिराम याने फिर्यादी श्रीराम निवास यांना फोन करुन सांगितले की, त्यांचा मुलगा आजारपणामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. श्रीराम श्रीपाल निवास यांच्या तक्रारीनुसार सुनेने त्यांचा मुलगा भानुप्रताप रामनिवास याला विषारी द्रव्य पिण्यास देऊन त्याला ठार मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. तशा स्वरूपाची लेखी तक्रार २३ जून २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील ला तिकोनियाँ पोलिस ठाणे, जिल्हा खिरी या पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
Ratnagiri Crime : लोटे गुरुकुलच्या कोकरे महाराजाचा पाय खोलात, अत्याचाराचा आणखी एक आरोप, अल्पवयीन पीडितेच्या आत्यावरही गुन्हा
या तक्रारीवरुन तेथील पोलिसांनी संशयितांविरुद्ध तिकोनियों पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीचे झिरो नंबरने हे तक्रारीचे प्रकरण दि. १८ ऑक्टोबरला ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या नुसार ग्रामीण पोलिसांनी संशयित उत्तर प्रदेशमधील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.

