• Wed. Mar 11th, 2026

    Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?

    Ratnagiri Crime : दोन वर्षांआधी लग्न, फोन केला की सून बोलायची ते बाहेर, एक दिवस बोलली ते वारले, रत्नागिरीत खळबळ, प्रकरण काय?

    Ratnagiri News : लग्न झाल्यावर दाम्पत्य रत्नागिरी येथे कामासाठी आलं होतं. गावारून आई-वडील फोन करायचे तेव्हा फक्त सूनबाई बोलायची. पण मुलगा कुठे काही सांगायची नाही, एक दिवस ती थेट बोलली पती गेलाय, तेव्हा आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : उत्तरप्रदेश येथून कामानिमित्त रत्नागिरी येथे आलेल्या पत्नीने पतीला विषारी पदार्थ प्राशन करण्यास देऊन त्याचा खून केल्याची तक्रार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून ही तक्रार झिरो नंबरने रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. संशयित पत्नीसह अन्य दोघांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे एका तरुणाचा त्याच्या पत्नीनेच विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. या प्रकरणी पत्नीसह सासू सासऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. भानुप्रताप रामनिवास (उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शर्मिला रामविलास असे पत्नीचे नाव आहे. मनीराम कल्लूराम (मयताचे सासरे, ४५, उत्तरप्रदेश), व मयताची सासू अशा तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील संशयितांमध्ये एका महिलेसह मनीराम कल्लराम (४५), मनीराम यांची पत्नी (नाव माहित नाही. ४०, रा. बरसोला कला, तिकोनियों. जिल्हा खिरी, राज्य उत्तर प्रदेश) अशी तीन संशयितांची नावे आहेत. ही घटना २० जून रोजी घडली होती.
    Maharashtra TimesUday Samant : ‘जर कोणाला खुमखुमी असेलच तर धनुष्यबाण कसा…’; कोकणात उदय सामंतांकडून भाजप-राष्ट्रवादीचा समाचार, कारण काय?
    फिर्यादी श्रीराम श्रीपाल निवास (४५, रा. बरसोला कला, तिकोनियों, जिल्हा खिरी, राज्य-उत्तरप्रदेश) यांचा मृत्यू झालेला मुलगा भानुप्रताप रामनिवास याचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार त्यांची सून फिर्यादी श्रीराम यांचा मुलगा भानूप्रताप यांच्यात नेहमीच वाद होत असत. दरम्यान, संशयित मनीराम कल्लरामच्या सांगण्यावरुन फिर्यादीचा मुलगा भानुप्रताप व त्याची पत्नी असे दोघेही कामासाठी रत्नागिरी आले होते. त्यानंतर फिर्यादी-श्रीराम निवास यांनी संशयित मनीराम याला वारंवार फोन करुन मुलाची विचारपूस करत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने तसेच सुनेने पतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
    Maharashtra TimesRatnagiri News: माझ्या मुलीचा खूप छळ केला, लेक गमावलेल्या आईने काय-काय सांगितलं? रत्नागिरी विवाहिता मृत्यू प्रकरणात नवी माहिती
    दरम्यान, २० जून २०२५ ला संशयित मनिराम याने फिर्यादी श्रीराम निवास यांना फोन करुन सांगितले की, त्यांचा मुलगा आजारपणामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. श्रीराम श्रीपाल निवास यांच्या तक्रारीनुसार सुनेने त्यांचा मुलगा भानुप्रताप रामनिवास याला विषारी द्रव्य पिण्यास देऊन त्याला ठार मारल्याचा संशय व्यक्त केला आहे. तशा स्वरूपाची लेखी तक्रार २३ जून २०२५ रोजी उत्तर प्रदेशातील ला तिकोनियाँ पोलिस ठाणे, जिल्हा खिरी या पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
    Maharashtra TimesRatnagiri Crime : लोटे गुरुकुलच्या कोकरे महाराजाचा पाय खोलात, अत्याचाराचा आणखी एक आरोप, अल्पवयीन पीडितेच्या आत्यावरही गुन्हा
    या तक्रारीवरुन तेथील पोलिसांनी संशयितांविरुद्ध तिकोनियों पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीचे झिरो नंबरने हे तक्रारीचे प्रकरण दि. १८ ऑक्टोबरला ग्रामीण पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या नुसार ग्रामीण पोलिसांनी संशयित उत्तर प्रदेशमधील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलिस करत आहेत.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा